शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:01 IST

डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापक म्हणून काम केले

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाब प्रांतातील एका गावात (फाळणीनंतर आता हे गाव पाकिस्तानात आहे) झाला. डॉ. सिंग यांनी १९४८ साली मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. १९६२ साली त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नूफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी. फिल केले. त्यांनी भारतातील निर्यात, आत्मनिर्भरता व विकासाच्या शक्यता या पुस्तकात देशातील निर्यातीवर आधारित व्यापार धोरणावर टीका केली. डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापक म्हणून काम केले. दरम्यान, त्यांनी काही वर्षे यूनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अॅड डेव्हलपमेंटच्या (यूएनसीटीएडी) सचिवालयातही काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन १९८७ आणि १९९० मध्ये त्यांची जिनिव्हा येथील दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

देशाला नवी उभारी देणारे एलपीजी मॉडेल...

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक म्हटले जाते ते त्यांनी आणलेल्या एलपीजी (लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन) मॉडेलमुळे! मनमोहन सिंग हे १० च्या दशकात पी. व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये देशाचे अर्थमंत्री होते. त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. खजिन्यात विदेशी चलन केवळ ५.८० अब्ज डॉलर एवढेच होते. त्यातून परदेशातून आयात करावयाच्या औषध, इंधन आदी अत्यावश्यक गोष्टी १५ दिवस पुरतील एवळधाच विकत घेणे शक्य होते. त्यावेळी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) तसेच यूरोपातील काही देशांकडे कर्जाची मागणी केली. परंतु आयएमएफने कर्ज देण्यासाठी एक अट घातली. विदेशी कंपन्यांना देशात येऊन व्यापार करण्याची परवानगी भारताने द्यावी, अशी ती अट होती. अशीच अट यूरोपीयन देशांनीदेखील घातली होती. त्यातूनच मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने एलपीजी मॉडेल' आणले. त्यातूनच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाला चालना मिळाली. सरकारने कंपन्यांच्या कारभारात कमीत कमी हस्तक्षेप करण्याचें धोरण अवलंबिले आर्थिक सुधारणांना गती दिली. वस्तू तसेच सेवांच्या क्षेत्रात विदेशी कंपन्यांना भारताचे द्वार खुले झाले. विदेशी कंपन्यांच्या बरोबरीनेच देशातील खासगी कंपन्यांनाही काम करण्याची संधी मिळाली. काही वर्षांतच देशाने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतली. भारत आर्थिक निर्भरतेच्या वाटेवरून चालू लागला. आपण महासत्तेची स्वप्ने पाहतो, याची विजे या मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील 'एलपीजी मॉडेल'मुळेच रोवली गेली.

...अन् भारताला मिळाला माहितीचा अधिकार

मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात २००५ मध्ये पारित झालेल्या माहिती अधिकार कायद्याने भारतीय नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणांकडून माहिती मिळविण्याचा अधिकार दिला, त्यामुळे सरकारी यंत्रणा अधिक जबाबदार आणि पारदर्शक बनल्या. 

भूसंपादन कायदा: २९ ऑगस्ट २०१३ रोजी, राज्यसभेने भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायद्यात वाजवी भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार मंजूर केला. 

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक