शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

'‘चुकार’ न्यायाधीशांच्या बदल्या करणे हा प्रभावी उपाय नाहीच'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 2:40 AM

न्या. चंद्रचूड यांचे मत; काही मध्यम मार्ग काढावा लागेल

नवी दिल्ली : उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध गैरवर्तनाच्या तक्रारी आल्यास अशा न्यायाधीशांची अन्यत्र बदली करणे हा न्यायसंस्था उत्तरदायी बनविण्याचा प्रभावी उपाय नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.न्या. चंद्रचूड म्हणाले की, ‘चुकार’ न्यायाधीशांच्या संदर्भात राज्यघटनेत महाभियोग आणि बदली असे दोन मार्ग आहेत. यापैकी महाभियोगाचा मार्ग अपवादाने स्वीकारला जातो व अद्यापपर्यंत एकदाही यशस्वी झालेला नाही. त्या तुलनेत बदली करण्याचा मार्ग जास्त वेळा अनुसरला जात असला तरी इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तोही प्रभावी उपाय नाही.प्रा. टॉम गिन्सबर्ग आणि अझीझ झेड. हक यांनी लिहिलेल्या ‘हाऊ टू सेव्ह ए कॉन्स्टिट्यूशनल डेमॉक्रसी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मंगळवारी रात्री ते बोलत होते. मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे ताहिलरामाणी यांची मेघालयला बदली होणे व ती न स्वीकराता न्या. ताहिलरामाणी यांनी राजीनामा देणे यावरून टीका होत असताना ‘कॉलेजियम’चे सदस्य असलेल्या न्या. चंद्रचूड यांनी हे भाष्य केले आहे.स्वायत्तता आवश्यकचन्यायसंस्थेचे उत्तरदायित्व व स्वायत्तता यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यावरही त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, न्यायसंस्थेच्या स्वायत्ततेमध्ये ही यंत्रणा अजिबात उत्तरदायी नसणे बिलकुल अभिप्रेत नाही. न्यायसंस्थेला निखालस खोट्या आरोपांपासून संरक्षण देण्यासाठी स्वायत्तता गरजेची आहे.हल्ली प्रत्येक महत्त्वाच्या निकालानंतर खास करून समाजमाध्यमांतून न्यायाधीशांवर व्यक्तिगत टीका होत असते; पण न्यायाधीश याला उत्तर देऊ शकत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. ज्येष्ठ वकील अरविंद पी. दातार यांचेही यावेळी भाषण झाले. लोकशाही टिकवून ठेवण्यात न्यायसंस्थेची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय