शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

उत्तर प्रदेशमधील आंदोलन स्थळांवरून शेतकऱ्यांना हटविले; आदित्यनाथ सरकारची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 06:33 IST

बळाचा वापर न केल्याचा दावा

लखनऊ : दिल्लीतील भीषण हिंसाचाराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशमधील भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने कडक पावले उचलत राज्यात जिथे जिथे शेतकरी धरणे धरून बसले होते, तिथून त्यांना बुधवारी रात्री  हटविले. त्यासाठी बळाचा वापर न केल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

उत्तर प्रदेशमधील चिल्ला सीमा, राष्ट्रीय प्रेरणास्थळ, नॉयडातील ग्रीन गार्डन व बागपत येथील बरौत येथे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी काही दिवसांपासून धरणे आंदोलन करत होते. तिथून या आंदोलकांना हटविण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना आंदोलनासाठी भाग पाडणाऱ्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. ते आरोपी सध्या फरारी आहेत.

महामार्गाच्या कामास विलंबाचे कारणबागपतचे उपजिल्हाधिकारी अनिलकुमार सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्यास विलंब लागत आहे, असे पत्र नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) उत्तर प्रदेश सरकारला पाठविले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने कारवाई करत राज्यातील आंदोलन स्थळांवरून शेतकऱ्यांना हटविले, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ