शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

उत्तर प्रदेशमधील आंदोलन स्थळांवरून शेतकऱ्यांना हटविले; आदित्यनाथ सरकारची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 06:33 IST

बळाचा वापर न केल्याचा दावा

लखनऊ : दिल्लीतील भीषण हिंसाचाराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशमधील भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने कडक पावले उचलत राज्यात जिथे जिथे शेतकरी धरणे धरून बसले होते, तिथून त्यांना बुधवारी रात्री  हटविले. त्यासाठी बळाचा वापर न केल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

उत्तर प्रदेशमधील चिल्ला सीमा, राष्ट्रीय प्रेरणास्थळ, नॉयडातील ग्रीन गार्डन व बागपत येथील बरौत येथे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी काही दिवसांपासून धरणे आंदोलन करत होते. तिथून या आंदोलकांना हटविण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना आंदोलनासाठी भाग पाडणाऱ्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. ते आरोपी सध्या फरारी आहेत.

महामार्गाच्या कामास विलंबाचे कारणबागपतचे उपजिल्हाधिकारी अनिलकुमार सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्यास विलंब लागत आहे, असे पत्र नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) उत्तर प्रदेश सरकारला पाठविले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने कारवाई करत राज्यातील आंदोलन स्थळांवरून शेतकऱ्यांना हटविले, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ