शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

7 वर्षांनंतर 'त्या' दोन जोडप्यांनी पुन्हा केलं लग्न; मुलं झाली वऱ्हाडी तर पोलिसांनी केलं कन्यादान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 16:07 IST

पोलीस स्टेशनबाहेर वाजत गाजत वऱ्हाडी मंडळी जमली होती. पोलिसांच्या समोरच सप्तपदी घेण्यात आले. या अनोख्या लग्नात दोन मुलं देखील सहभागी झाली होती. 

नवी दिल्ली - राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका अजब लग्नाची गजब गोष्ट समोर आली आहे. तब्बल सात वर्षांनी दोन जोडप्यांनी लग्न केलं. विशेष म्हणजे त्यांची मुलं देखील या लग्नाला उपस्थित होती. तर पोलिसांनी कन्यादान केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमध्ये पोलीस ठाण्यात दोन जोडप्यांचं धुमधडाक्यात लग्न करण्यात आलं आले. पोलीस स्टेशनबाहेर वाजत गाजत वऱ्हाडी मंडळी जमली होती. पोलिसांच्या समोरच सप्तपदी घेण्यात आले. या अनोख्या लग्नात दोन मुलं देखील सहभागी झाली होती. 

दोन जोडप्यांमध्ये एका छोट्याशा कारणावरून वाद झाला होता. पुढे तो वाद टोकाला गेला आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना समजावलं. त्यांच्यातील वाद मिटवला आणि पुन्हा एकदा पोलीस ठाण्यातच त्याचं लग्न लावून दिलं. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये दोन कुटुंबीयांनी आपल्या मुलींचं लग्न केलं होतं. देवतडा येथे राहणाऱ्या कंवराराम यांचा मुलगा गिरधारीराम याचं लग्न अरटिया खुर्द येथील जीवनरामची मुलगी उषा हिच्यासोबत झालं. 

उषाचा भाऊ विशनारामसोबत गिरधारीरामची बहीण धारू हिचं लग्न देखील तेव्हाच झालं. काही कौटुंबिक वादामुळे दोन्ही कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाला. एक वर्षापूर्वी उषा आपल्या घरी परत आली तर धारू देखील तिच्या घरी निघून गेली. हे प्रकरण पुढे पोलिसांत गेलं. त्यावेळी पोलिसांनी दोन्ही जोडपी आणि त्यांच्या कुटुंबीयांना समजावलं. मुलांच्या भविष्यासाठी एकत्र राहणं किती गरजेचं आहे ते सांगितलं. यानंतर दोन्ही कुटुंब तयार झाली आणि पुन्हा एकदा सात वर्षांनी त्यांचं लग्न लावण्यात आलं. या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस