शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

7 वर्षांनंतर 'त्या' दोन जोडप्यांनी पुन्हा केलं लग्न; मुलं झाली वऱ्हाडी तर पोलिसांनी केलं कन्यादान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 16:07 IST

पोलीस स्टेशनबाहेर वाजत गाजत वऱ्हाडी मंडळी जमली होती. पोलिसांच्या समोरच सप्तपदी घेण्यात आले. या अनोख्या लग्नात दोन मुलं देखील सहभागी झाली होती. 

नवी दिल्ली - राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका अजब लग्नाची गजब गोष्ट समोर आली आहे. तब्बल सात वर्षांनी दोन जोडप्यांनी लग्न केलं. विशेष म्हणजे त्यांची मुलं देखील या लग्नाला उपस्थित होती. तर पोलिसांनी कन्यादान केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमध्ये पोलीस ठाण्यात दोन जोडप्यांचं धुमधडाक्यात लग्न करण्यात आलं आले. पोलीस स्टेशनबाहेर वाजत गाजत वऱ्हाडी मंडळी जमली होती. पोलिसांच्या समोरच सप्तपदी घेण्यात आले. या अनोख्या लग्नात दोन मुलं देखील सहभागी झाली होती. 

दोन जोडप्यांमध्ये एका छोट्याशा कारणावरून वाद झाला होता. पुढे तो वाद टोकाला गेला आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना समजावलं. त्यांच्यातील वाद मिटवला आणि पुन्हा एकदा पोलीस ठाण्यातच त्याचं लग्न लावून दिलं. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये दोन कुटुंबीयांनी आपल्या मुलींचं लग्न केलं होतं. देवतडा येथे राहणाऱ्या कंवराराम यांचा मुलगा गिरधारीराम याचं लग्न अरटिया खुर्द येथील जीवनरामची मुलगी उषा हिच्यासोबत झालं. 

उषाचा भाऊ विशनारामसोबत गिरधारीरामची बहीण धारू हिचं लग्न देखील तेव्हाच झालं. काही कौटुंबिक वादामुळे दोन्ही कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाला. एक वर्षापूर्वी उषा आपल्या घरी परत आली तर धारू देखील तिच्या घरी निघून गेली. हे प्रकरण पुढे पोलिसांत गेलं. त्यावेळी पोलिसांनी दोन्ही जोडपी आणि त्यांच्या कुटुंबीयांना समजावलं. मुलांच्या भविष्यासाठी एकत्र राहणं किती गरजेचं आहे ते सांगितलं. यानंतर दोन्ही कुटुंब तयार झाली आणि पुन्हा एकदा सात वर्षांनी त्यांचं लग्न लावण्यात आलं. या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस