शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

धार्मिक स्वातंत्र्य; अमेरिकेचा अहवाल भारताने फेटाळला  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 4:49 AM

भारतात बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांवर हल्ले चढविले जात आहेत, असा आरोप करणारा अमेरिकी परराष्ट्र खात्याचा ताजा अहवाल भारताने फेटाळून लावला.

नवी दिल्ली : भारतात बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांवर हल्ले चढविले जात आहेत, असा आरोप करणारा अमेरिकी परराष्ट्र खात्याचा ताजा अहवाल भारताने फेटाळून लावला. देशात सहिष्णुतेचे वातावरण कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.गोहत्या किंवा गोमांस विक्री केल्याच्या आरोपावरून भारतात हिंदूंनी अल्पसंख्याकांवर विशेषत: मुस्लिमांवर हल्ले केल्याचे प्रकार गेल्या वर्षीही सुरू राहिले, असा आरोप या अहवालात होता. त्यातील निष्कर्षांबाबत भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविशकुमार यांनी सांगितले की, भारत हा लोकशाही देश असून आमच्याकडे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचे पालन केले जाते. सहिष्णूता व सर्वसमावेशकता टिकून राहावी यासाठी आम्ही दक्ष असतो.भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना मूलभूत हक्क तसेच धार्मिक स्वातंत्र्य प्रदान केले आहे. देशात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे नेहमीच रक्षण करते. त्यामुळे परक्या देशाने किंवा तेथील सरकारला भारतातील नागरिकांच्या स्थितीबद्दल मतप्रदर्शन करण्याचा काहीही अधिकार नाही.उलट अशा बहुतांश घटना स्थानिक वादातून किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे झाल्याचे दिसून येते.भाजपचे म्हणणे काय?हा अहवाल भाजपनेही फेटाळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि त्यांचा पक्ष यांच्याविषयी मनात पूर्वग्रह ठेवून तो तयार केला असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. या अहवालात भाजप पदाधिकाऱ्यांवर समाजात द्वेष पसरविणारी भाषणे करण्याचा आणि सरकारवर स्वघोषित गोरक्षकांना पाठीशी घालण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.त्याचा ठामपणे इन्कार करीत भाजपचे राष्ट्रीय माध्यम प्रमुख अनिल बालुनी यांनी निवेदनात म्हटले की, अल्पसंख्य समाजाविरुद्ध योजनाबद्ध पद्धतीने हिंसाचार केला जातो, हे या अहवालातील मूलभूत गृहीतकच धादांत खोटे आहे.

 

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिका