शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

मुकेश अंबानींना 'जिओ'ची भन्नाट आयडिया कुणी सुचवली माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 16:33 IST

रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना रिलायन्स जिओ सुरू करण्याची भन्नाट कल्पना कुणी दिली ?

मुंबई- रिलायन्स जिओचं सीमकार्ड आज प्रत्येकजण वापरताना पाहायला मिळतं. जिओचं नेटवर्क न वापरणारे क्वचितच सापडतील. इतकंच नाही, तर रिलायन्स जिओने दोन वर्षांच्या आत भारताला दुनियेतील सगळ्यात मोठा ब्रॉडबॅण्ड डेटा वापरणारा देश बनवलं आहे. पण रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना रिलायन्स जिओ सुरू करण्याची भन्नाट कल्पना कुणी दिली ? हे तुम्हाला माहितीये का ? मुकेश अंबानी यांना त्यांची मुलगी ईशा अंबानी हिने जिओची भन्नाट कल्पना सुचविली आहे. मुकेश अंबानी यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला 'ड्रायवर्स ऑफ चेंज' पुरस्कार मिळाल्यानिमित्ताने त्यांनी याबद्दलची माहिती दिली.

 ईशाने 2011 साली जिओची कल्पना दिल्याचं त्यांनी म्हंटलं. त्यानंतर रिलायन्सने भारतीय मोबाइल बाजारपेठेत तब्बल ३१ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २.०१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. २०१६ मध्ये लाँच केलेल्या या कंपनीने टेलिकॉमच्या दुनियेत वादळ आणलं. ग्राहकांना सुरुवातीला मोफत कॉल्स आणि डेटा देऊन मार्केटवर जवळजवळ ताबा मिळविला. मोबाइल कंपन्यांना या स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी डेटा आणि कॉलिंगचे दर घटवावे लागले.

मुकेश अंबानी यांनी म्हंटलं की, जिओची कल्पना सगळ्यात आधी माझ्या मुलीने 2011 साली दिली. तेव्हा ती येल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होती व सुट्ट्यांसाठी घरी आली होती. घरातील इंटरनेट नीट चालत नसल्याचं तिने कॉलेजचं काम करताना सांगितलं होतं. ईशा आणि तिचा जुळा भाऊ आकाश भारताची युवा पिढी आहेत.  ही पिढी जनरेशन नेक्स्ट बनण्यासाठी खूप वाट पाहू शकत नाही. त्यांनी मला पटवून दिलं की ब्रॉडबँड इंटरनेटच्या तंत्रज्ञानापासून भारताला फार काळ दूर ठेवता येणार नाही.' 

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओMukesh Ambaniमुकेश अंबानी