शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

कॉर्पोरेट शेतीसाठी जमीन खरेदीची रिलायन्सची योजना नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 05:50 IST

कृषी आंदोलनाबाबत जिओने उच्च न्यायालयात दाखल याचिकेत स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कॉर्पोरेट शेतीसाठी पंजाब-हरियाणा अथवा देशात इतरत्र कोठेही जमीन खरेदी करण्याचा आमचा इरादा नसल्याचा खुलासा मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स उद्योग समूहाने केला आहे. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी रिलायन्स उद्योग समूहाला लक्ष्य केल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी जिओ इन्फोकॉमने पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यात हे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

तीन कृषी कायद्यांचा मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींना फायदा होणार असून, ते शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करतील, अशी धारणा शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी या कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. आंदोलक शेतकरी या कंपन्यांविरोधात राग व्यक्त करीत आहेत. पंजाबातील रिलायन्स जिओच्या १,५०० पेक्षा अधिक दूरसंचार टॉवरांची आंदोलकांनी मोडतोड केली आहे. कृषी कायदे हे जिओला अनुकूल बनविण्यात आल्याचा आंदोलकांचा समज असून, त्यामुळे त्यांनी जिओवर बहिष्कार टाकला आहे.रिलायन्स आणि तिच्या कोणत्याही उपकंपनीने पंजाब, हरियाणा अथवा देशात इतरत्र कॉर्पोरेट अथवा कंत्राटी शेतीसाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या जमीन खरेदी केलेली नाही. भविष्यातही आमची अशी काही योजना नाही.

कंपनीने म्हटले की, आपल्या टॉवरांच्या हानीची सरकारने दखल घ्यावी. हिंसेमुळे आमच्या हजारो कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. आवश्यक प्रवास, विक्री आणि सेवा यांत बाधा निर्माण झाली आहे.

नाव जोडले गेल्याने प्रतिष्ठा झाली कमीरिलायन्सने म्हटले की, कृषी कायद्यांशी आमचा कोणताही संबंध नाही. या कायद्यांशी आमचे नाव जोडून आमचा व्यवसाय आणि प्रतिष्ठेचे नुकसान केले जात आहे. या कायद्यांचा कंपनीला कोणत्याही प्रकारचा लाभ नाही. रिलायन्स रिटेल आणि जिओ इन्फोकॉम यांच्याशी संबंधित कोणतीही कंपनी ‘कॉर्पोरेट’ अथवा ‘कंत्राटी’ शेती करीत नाही. नजीकच्या भविष्यातही कंपनीचा असा कोणताही इरादा नाही.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीReliance Jioरिलायन्स जिओ