शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा, राजनाथ सिंह यांचा बैठकीनंतर दावा; सर्व संबंधितांशी बोलण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:38 IST

गेल्या वर्षभरात काश्मीर खोºयातील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे व शांततेचे काही हिरवे कोंब दिसत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे म्हणाले. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधितांशी बोलण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, असेही राजनाथ सिंह यांनी या वेळी बोलून दाखविले.

श्रीनगर : गेल्या वर्षभरात काश्मीर खोºयातील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे व शांततेचे काही हिरवे कोंब दिसत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे म्हणाले. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधितांशी बोलण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, असेही राजनाथ सिंह यांनी या वेळी बोलून दाखविले. त्यांच्या या वक्तव्यातून केंद्र सरकारच्या भूमिकेमध्ये बदल झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.जम्मू व काश्मीरच्या चार दिवसांच्या दौ-यावर आलेले राजनाथ सिंह वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की, काश्मीरमधील शांततेचे झाड वाळून गेलेले नाही. काश्मीर प्रश्नावरील कायमचे उत्तर हे कम्पॅशन (करुणा), कम्युनिकेशन (संवाद), को-एक्झिस्टन्स (सहअस्तित्व), कॉन्फिडन्स बिल्डिंग (आत्मविश्वास निर्माण करणे) व कन्सिस्टन्सी (सातत्य) या पाच ‘सी’वर अवलंबून आहे. शिष्टमंडळांनी घेतलेल्या भेटी व घेतलेल्या बैठकांनंतर काश्मीरमध्ये परिस्थितीत मोठी सुधारणा झाल्याचे माझ्या लक्षात आले आहे. परिस्थिती सुधारत आहे, हे मी ठाम विश्वासाने सांगतो, असे ते म्हणाले. पर्यटक व पर्यटन संस्थांनी पुन्हा एकवार काश्मीरमध्ये दौरे सुरू करावेत, त्यांचे इथे स्वागतच होईल, असेही केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. (वृत्तसंस्था)दोन दहशतवादी ठारकाश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी रविवारी रात्री दोन अज्ञात दहशतवाद्यांना ठार मारले, तर तिसºयाला जिवंत पकडले. खुदवाणी भागात दहशतवादी असल्याची निश्चित माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षादलांनी त्याला वेढा घालून शोध सुरू केला. त्या वेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.त्यांना सुरक्षादलांनी तसेच प्रतिउत्तर दिले. त्यात दोन दहशतवादी ठार झाले, तर तिसºयाला जिवंत पकडण्यात यश मिळाले. हे दहशतवादी कोणत्या गटाचे आहेत, हे अजून निश्चित समजलेले नाही, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. अशाच प्रकारच्या चकमकीत शनिवारी रात्री शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते. तिसरा दहशतवादी शरण आला होता.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू काश्मिरIndiaभारत