शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा, राजनाथ सिंह यांचा बैठकीनंतर दावा; सर्व संबंधितांशी बोलण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:38 IST

गेल्या वर्षभरात काश्मीर खोºयातील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे व शांततेचे काही हिरवे कोंब दिसत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे म्हणाले. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधितांशी बोलण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, असेही राजनाथ सिंह यांनी या वेळी बोलून दाखविले.

श्रीनगर : गेल्या वर्षभरात काश्मीर खोºयातील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे व शांततेचे काही हिरवे कोंब दिसत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे म्हणाले. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधितांशी बोलण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, असेही राजनाथ सिंह यांनी या वेळी बोलून दाखविले. त्यांच्या या वक्तव्यातून केंद्र सरकारच्या भूमिकेमध्ये बदल झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.जम्मू व काश्मीरच्या चार दिवसांच्या दौ-यावर आलेले राजनाथ सिंह वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की, काश्मीरमधील शांततेचे झाड वाळून गेलेले नाही. काश्मीर प्रश्नावरील कायमचे उत्तर हे कम्पॅशन (करुणा), कम्युनिकेशन (संवाद), को-एक्झिस्टन्स (सहअस्तित्व), कॉन्फिडन्स बिल्डिंग (आत्मविश्वास निर्माण करणे) व कन्सिस्टन्सी (सातत्य) या पाच ‘सी’वर अवलंबून आहे. शिष्टमंडळांनी घेतलेल्या भेटी व घेतलेल्या बैठकांनंतर काश्मीरमध्ये परिस्थितीत मोठी सुधारणा झाल्याचे माझ्या लक्षात आले आहे. परिस्थिती सुधारत आहे, हे मी ठाम विश्वासाने सांगतो, असे ते म्हणाले. पर्यटक व पर्यटन संस्थांनी पुन्हा एकवार काश्मीरमध्ये दौरे सुरू करावेत, त्यांचे इथे स्वागतच होईल, असेही केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. (वृत्तसंस्था)दोन दहशतवादी ठारकाश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी रविवारी रात्री दोन अज्ञात दहशतवाद्यांना ठार मारले, तर तिसºयाला जिवंत पकडले. खुदवाणी भागात दहशतवादी असल्याची निश्चित माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षादलांनी त्याला वेढा घालून शोध सुरू केला. त्या वेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.त्यांना सुरक्षादलांनी तसेच प्रतिउत्तर दिले. त्यात दोन दहशतवादी ठार झाले, तर तिसºयाला जिवंत पकडण्यात यश मिळाले. हे दहशतवादी कोणत्या गटाचे आहेत, हे अजून निश्चित समजलेले नाही, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. अशाच प्रकारच्या चकमकीत शनिवारी रात्री शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते. तिसरा दहशतवादी शरण आला होता.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू काश्मिरIndiaभारत