शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात महामार्गावरील अपघातांत घट; मृत्यूचे प्रमाणही घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 02:39 IST

मृत्यूचे प्रमाणही घटले

हरिश गुप्तानवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावरील अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. जागतिक अहवालानुसार (वर्ल्ड रोडस्टॅटीस्टिक्स२०१८) भारतात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण देशांत सर्वाधिक आहे;  परंतु, मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षात केलेल्या प्रयत्नांमुळे स्थिती सुधारली आहे.

२०१८मध्ये ६.६४ टक्के होते, ते २०१९ मध्ये ६.०९ टक्क्यांवर आले असून अपघाती मृत्यू आणि जखमीं होण्याचे प्रमाणही घटले आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागच्या आठवड्यात लोकसभेत पूनम महाजन यांच्या प्रश्नाला उत्तरादाखल उपरोक्त माहिती दिली. २०१८ च्या तुलनेत महाराष्ट्रासह देशभरात २०१९ मध्ये कमी अपघात घडले, या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ गडकरी यांनी ही आकडेवारी दिली. केंद्रीय मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते सुरक्षा मुद्याचे निराकरण करण्यासाठी बहुस्तरीय रणनीती केली आहे.

गडकरी यांनी लोकसभेतील खासदाराच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात लोकजागृतीसाठी खासदारांची रस्ते सुरक्षा समिती स्थापन करण्याची कल्पना विकसित केली आहे. यात राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करुन त्यात सुधारणा करणे यासारख्या रस्ते स्थापत्य अभियांत्रिकीवर विशेष भर देण्यात आला आहे.

अपघातानंतरच्या पहिल्या महत्त्वाचा तासात अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी रोकडरहीत योजना सुरु करण्यात आली असून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल नाक्यांवर ५५० रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत.  अतिवेगाने, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, चुकीच्या बाजुने वाहन चालविणे तसेच वाहन चालवितांना मोबाईल फोनचा  वापर, वाहनांतील यांत्रिकी दोष, हवामान आणि वाहतुकीसंदर्भातील रस्त्यांवरील मार्गदर्शक खुणासंबंधी माहितीचा अभाव आदी अपघातामागची कारणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAccidentअपघातIndiaभारत