शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

महाराष्ट्रात महामार्गावरील अपघातांत घट; मृत्यूचे प्रमाणही घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 02:39 IST

मृत्यूचे प्रमाणही घटले

हरिश गुप्तानवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावरील अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. जागतिक अहवालानुसार (वर्ल्ड रोडस्टॅटीस्टिक्स२०१८) भारतात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण देशांत सर्वाधिक आहे;  परंतु, मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षात केलेल्या प्रयत्नांमुळे स्थिती सुधारली आहे.

२०१८मध्ये ६.६४ टक्के होते, ते २०१९ मध्ये ६.०९ टक्क्यांवर आले असून अपघाती मृत्यू आणि जखमीं होण्याचे प्रमाणही घटले आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागच्या आठवड्यात लोकसभेत पूनम महाजन यांच्या प्रश्नाला उत्तरादाखल उपरोक्त माहिती दिली. २०१८ च्या तुलनेत महाराष्ट्रासह देशभरात २०१९ मध्ये कमी अपघात घडले, या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ गडकरी यांनी ही आकडेवारी दिली. केंद्रीय मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते सुरक्षा मुद्याचे निराकरण करण्यासाठी बहुस्तरीय रणनीती केली आहे.

गडकरी यांनी लोकसभेतील खासदाराच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात लोकजागृतीसाठी खासदारांची रस्ते सुरक्षा समिती स्थापन करण्याची कल्पना विकसित केली आहे. यात राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करुन त्यात सुधारणा करणे यासारख्या रस्ते स्थापत्य अभियांत्रिकीवर विशेष भर देण्यात आला आहे.

अपघातानंतरच्या पहिल्या महत्त्वाचा तासात अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी रोकडरहीत योजना सुरु करण्यात आली असून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल नाक्यांवर ५५० रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत.  अतिवेगाने, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, चुकीच्या बाजुने वाहन चालविणे तसेच वाहन चालवितांना मोबाईल फोनचा  वापर, वाहनांतील यांत्रिकी दोष, हवामान आणि वाहतुकीसंदर्भातील रस्त्यांवरील मार्गदर्शक खुणासंबंधी माहितीचा अभाव आदी अपघातामागची कारणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAccidentअपघातIndiaभारत