शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात महामार्गावरील अपघातांत घट; मृत्यूचे प्रमाणही घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 02:39 IST

मृत्यूचे प्रमाणही घटले

हरिश गुप्तानवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावरील अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. जागतिक अहवालानुसार (वर्ल्ड रोडस्टॅटीस्टिक्स२०१८) भारतात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण देशांत सर्वाधिक आहे;  परंतु, मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षात केलेल्या प्रयत्नांमुळे स्थिती सुधारली आहे.

२०१८मध्ये ६.६४ टक्के होते, ते २०१९ मध्ये ६.०९ टक्क्यांवर आले असून अपघाती मृत्यू आणि जखमीं होण्याचे प्रमाणही घटले आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागच्या आठवड्यात लोकसभेत पूनम महाजन यांच्या प्रश्नाला उत्तरादाखल उपरोक्त माहिती दिली. २०१८ च्या तुलनेत महाराष्ट्रासह देशभरात २०१९ मध्ये कमी अपघात घडले, या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ गडकरी यांनी ही आकडेवारी दिली. केंद्रीय मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते सुरक्षा मुद्याचे निराकरण करण्यासाठी बहुस्तरीय रणनीती केली आहे.

गडकरी यांनी लोकसभेतील खासदाराच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात लोकजागृतीसाठी खासदारांची रस्ते सुरक्षा समिती स्थापन करण्याची कल्पना विकसित केली आहे. यात राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करुन त्यात सुधारणा करणे यासारख्या रस्ते स्थापत्य अभियांत्रिकीवर विशेष भर देण्यात आला आहे.

अपघातानंतरच्या पहिल्या महत्त्वाचा तासात अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी रोकडरहीत योजना सुरु करण्यात आली असून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल नाक्यांवर ५५० रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत.  अतिवेगाने, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, चुकीच्या बाजुने वाहन चालविणे तसेच वाहन चालवितांना मोबाईल फोनचा  वापर, वाहनांतील यांत्रिकी दोष, हवामान आणि वाहतुकीसंदर्भातील रस्त्यांवरील मार्गदर्शक खुणासंबंधी माहितीचा अभाव आदी अपघातामागची कारणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAccidentअपघातIndiaभारत