शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

ईडब्ल्यूएस आरक्षणाबद्दलच्या निर्णयाचा फेरविचार करा, काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 10:42 IST

ईडब्ल्यूएस आरक्षणातून अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय यांच्यातील गरिबांना वगळण्यात आले आहे. जया ठाकूर यांनी ॲड. वरिंदरकुमार शर्मा यांच्या माध्यमातून ही फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) शिक्षण संस्था व सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण ठेवण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. त्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी केली आहे.ईडब्ल्यूएस आरक्षणातून अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय यांच्यातील गरिबांना वगळण्यात आले आहे. जया ठाकूर यांनी ॲड. वरिंदरकुमार शर्मा यांच्या माध्यमातून ही फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ७ नोव्हेंबर रोजी ईडब्ल्यूएस आरक्षणासंदर्भात ३:२ बहुमताने निकाल दिला होता. त्यात म्हटले होते की, या आरक्षणामुळे घटनेतील कोणत्याही तरतुदीचा भंग झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात समावेश असलेले तत्कालीन सरन्यायाधीश उदय लळित व न्या. एस. रवींद्र भट यांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाविरोधात मत व्यक्त केले तर न्या. दिनेश महेश्वरी, न्या. बेला त्रिवेदी, न्या. जे. बी. पारडीवाला यांनी या आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे खंडपीठातील बहुमतानुसार ईडब्ल्यूएस आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी निर्णयाबाबत केलेल्या फेरविचार याचिकेची सर्वोच्च न्यायालयात कधी सुनावणी कधी होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस