शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

ईडब्ल्यूएस आरक्षणाबद्दलच्या निर्णयाचा फेरविचार करा, काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 10:42 IST

ईडब्ल्यूएस आरक्षणातून अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय यांच्यातील गरिबांना वगळण्यात आले आहे. जया ठाकूर यांनी ॲड. वरिंदरकुमार शर्मा यांच्या माध्यमातून ही फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) शिक्षण संस्था व सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण ठेवण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. त्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी केली आहे.ईडब्ल्यूएस आरक्षणातून अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय यांच्यातील गरिबांना वगळण्यात आले आहे. जया ठाकूर यांनी ॲड. वरिंदरकुमार शर्मा यांच्या माध्यमातून ही फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ७ नोव्हेंबर रोजी ईडब्ल्यूएस आरक्षणासंदर्भात ३:२ बहुमताने निकाल दिला होता. त्यात म्हटले होते की, या आरक्षणामुळे घटनेतील कोणत्याही तरतुदीचा भंग झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात समावेश असलेले तत्कालीन सरन्यायाधीश उदय लळित व न्या. एस. रवींद्र भट यांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाविरोधात मत व्यक्त केले तर न्या. दिनेश महेश्वरी, न्या. बेला त्रिवेदी, न्या. जे. बी. पारडीवाला यांनी या आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे खंडपीठातील बहुमतानुसार ईडब्ल्यूएस आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी निर्णयाबाबत केलेल्या फेरविचार याचिकेची सर्वोच्च न्यायालयात कधी सुनावणी कधी होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस