शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

ईडब्ल्यूएस आरक्षणाबद्दलच्या निर्णयाचा फेरविचार करा, काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 10:42 IST

ईडब्ल्यूएस आरक्षणातून अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय यांच्यातील गरिबांना वगळण्यात आले आहे. जया ठाकूर यांनी ॲड. वरिंदरकुमार शर्मा यांच्या माध्यमातून ही फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) शिक्षण संस्था व सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण ठेवण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. त्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी केली आहे.ईडब्ल्यूएस आरक्षणातून अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय यांच्यातील गरिबांना वगळण्यात आले आहे. जया ठाकूर यांनी ॲड. वरिंदरकुमार शर्मा यांच्या माध्यमातून ही फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ७ नोव्हेंबर रोजी ईडब्ल्यूएस आरक्षणासंदर्भात ३:२ बहुमताने निकाल दिला होता. त्यात म्हटले होते की, या आरक्षणामुळे घटनेतील कोणत्याही तरतुदीचा भंग झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात समावेश असलेले तत्कालीन सरन्यायाधीश उदय लळित व न्या. एस. रवींद्र भट यांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाविरोधात मत व्यक्त केले तर न्या. दिनेश महेश्वरी, न्या. बेला त्रिवेदी, न्या. जे. बी. पारडीवाला यांनी या आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे खंडपीठातील बहुमतानुसार ईडब्ल्यूएस आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी निर्णयाबाबत केलेल्या फेरविचार याचिकेची सर्वोच्च न्यायालयात कधी सुनावणी कधी होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस