शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

राजस्थानात बंडखोर नेत्यांमुळे भाजपपुढे अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 05:31 IST

राजस्थानातील सत्ताधारी भाजपला आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षातील बंडखोरीमुळे मोठा फटका बसण्याची किंवा पराभवाला सामोरे जावे लागण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जयपूर  - राजस्थानातील सत्ताधारी भाजपला आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षातील बंडखोरीमुळे मोठा फटका बसण्याची किंवा पराभवाला सामोरे जावे लागण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या कार्यशैलीवर भाजपचे अनेक नेते व कार्यकर्ते नाराज असून, काही जणांनी पक्ष सोडायलाही सुरुवात केली आहे.ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र व बारमेर जिल्ह्यातील आमदार मानवेंद्र सिंह यांनी पदाचा व भाजपच्या सदस्यात्वाचाही राजीनामा दिला. याआधी घनश्याम तिवारी, हनुमान बेनिवाल, किरोडीसिंह बैन्सला या नेत्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला होता. निवडणुकीत हे बंडखोर नेते काँग्रेसपेक्षा भाजपचीच मते खाण्याचा जास्त धोका आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांना बारमेर येथून भाजपने उमेदवारी नाकारली होती. ती गोष्ट मनाला लागलेले त्यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. राजघराण्याची पार्श्वभूमी व राजपूत समाजाचा असलेला भक्कम पाठिंबा ही मानवेंद्र सिंह यांची बलस्थाने आहेत. (वृत्तसंस्था)हे देऊ शकतात त्राससहा वेळा भाजपचे आमदार असलेले व दोनदा मंत्रिपद भूषविलेले घनश्याम तिवारी जूनमध्ये पक्षातून बाहेर पडले. त्यांनी भारत वाहिनी सेना नावाचा पक्ष स्थापन केला आहे.ब्राह्मण समाजातील प्रभावी नेते असलेल्या तिवारी यांची सिकर व जयपूर परिसरावर चांगलीच राजकीय पकड आहे. वसुंधराराजे यांच्याशी तीव्र मतभेद झाल्याने नागौर येथील जाट समाजाचे नेते हनुमान बेनिवाल यांनीही भाजपचा त्याग केला.देशभर २००८ साली गाजलेल्या गुज्जर आंदोलनातील नेते किरोडीसिंह बैन्सला यांनी २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढविली होती; पण ते पराभूत झाले. त्यानंतर ते या पक्षापासून कायमचेच दुरावले. हे चार व आणखी बंडखोर नेते आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला वात आणणार, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थान