शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"कुठल्याही मदतीसाठी तयार', रशियानं यूक्रेनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यांनंतर भारतानं दिली अशी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 20:16 IST

भारताने युक्रेन युद्ध पुन्हा भडकल्याने सोमवारी चिंता व्यक्त केली आहे. युद्धाचा निर्णय कुणाच्याही हिताचा नाही. यामुळे सर्व पक्षांनी शत्रुत्व टाळून तत्काल मुत्सद्देगिरी आणि संवादाचा मार्ग स्वीकारायला हवा, असे भारताने म्हटले आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यांसंदर्भात भारताने प्रतिक्रिया दिली आहे. युद्ध भडकणे कुणाच्याही हिताचे नाही, असे भारताने म्हटले आहे. याच वेळी मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमाने मार्ग काढावा, असा आग्रहही भारताने  केला आहे. एवढेच नाही, तर आपण तणाव कमी करण्याच्या दृष्टीने कोणत्याही मदतीसाठी तयार आहोत, असेही भारताने म्हटले आहे.

भारताने युक्रेन युद्ध पुन्हा भडकल्याने सोमवारी चिंता व्यक्त केली आहे. युद्धाचा निर्णय कुणाच्याही हिताचा नाही. यामुळे सर्व पक्षांनी शत्रुत्व टाळून तत्काल मुत्सद्देगिरी आणि संवादाचा मार्ग स्वीकारायला हवा, असे भारताने म्हटले आहे. गेल्य काही दिवसांच्या शांततेनंतर रशियाने सोमवारी युक्रेनच्या काही भागांवर मिसाइल हल्ले केल्यानंतर, माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

बागची म्हणाले, ‘‘आम्ही सर्व पक्षांना तत्काळ शत्रुत्वाचा त्याग करून कूटनिती आणि संवादाच्या मार्गावर परतण्याचे आवाहन करत आहोत. तसेच, स्थिती सामान्य करण्याच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या सर्व प्रयत्नांसाठी भारत तयार आहे. युक्रेनमधील संघर्ष पुन्हा भडकल्याने भारत चिंतित आहे. कारण यात पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आणि अनेकांचा मृत्यू झाला."

रशियाने 24 तासांत 75 क्षेपणास्त्रे डागली - युक्रेनच्या म्हणण्यानुसार, रशियाने युक्रेनवर 24 तासांत 75 क्षेपणास्त्रे डागली आहेत. एजन्सी रिपोर्टनुसार, रशियन हल्ल्यात 8 लोकांचा मृत्यू झाला, तर 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. रशियन हल्ल्यात लिव्ह, पोल्टावा, खार्किव, कीव या शहरांतील अनेक भाग जळून खाक झाले आहेत. या शहरांमधील इंटरनेट सेवाही बंद झाली आहे. या हल्ल्यात डझनहून अधिक गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाIndiaभारतwarयुद्ध