शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

"लोक मरत होते अन् उत्सव सुरू होता, तेव्हा अल्लू अर्जुनला अटक केली, मग इथे का नाही?" बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:10 IST

बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांच्यावर हल्लाबोल

बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर RCB च्या विजयी मिरवणुकीपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर डझनावर लोक जखमी झाल आहेत. यावरू आता विरोधकांनी कर्नाटक सरकारला घेरले आहे. ही घटना म्हणजे, 'सरकारी अपयश' आणि 'राजकीय लालसे'चा परिणाम असल्याचे भाजपने म्हटले आहे. यासंदर्भात भाजपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ही केवळ चेंगराचेंगरीच नव्हती, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील भांडणातून निर्माण झालेली सरकारनिर्मित दुर्घटना होती."

राहुल गांधीवर थेट निशाणा - भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, "राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भारतीय लष्कराची खिल्ली उडवत असतात. मात्र, एका दुर्घटनेत एवढ्या लोकांचा मृत्यू झाला असताना राहुल गांधी कोठे आहेत?" एवढेच नाही तर, राहुल गांधी यांनी या संदर्भात तत्काळ कारवाई करावी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना दिल्लीला हजर राहण्याचे आदेश द्यावेत.

"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा" -पात्रा म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेत मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्री यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा. तसेच, डीके शिवकुमार  यांनी जनतेची माफी मागायला हवी.

“लोक मरत होते आणि तेथे उत्सव सुरू होता” -दुर्घटनेदरम्यान झालेल्या निष्काळजीपणासंदर्भात बोलतान भाजपने म्हटले आहे की, "जेव्हा लोक मरत होते, तेव्हा तेथे उत्सव साजरा केला जात होता. आजही 50 लोक रुग्णालयात दाखल आहेत."

"3 लाख लोक पोहोचलेच कसे?"दुर्घटनेसंदर्भात भाष्य करताना, "तेथे 300000 लोक कसे पोहोचले? त्यांना परवानगी दिली गेली होती? जर पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, तर ही विजयी मिरवणूक निघली कशी? असे प्रश्नही भाजपने उपस्थित केले आहेत.

"तेव्हा अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली, तर मग इथे का नाही?" -यावेळी भाजपने गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता अल्लू अर्जुनसोबत घडलेल्या प्रसंगाची आठवण करून देत, अभिनेता अल्लू अर्जुनला चेंगरा चेंगरीच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. तर मग या प्रकरणात डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यावर कार्रवाई का होऊ नये? असा सवालही भाजपने केला आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी