शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

"लोक मरत होते अन् उत्सव सुरू होता, तेव्हा अल्लू अर्जुनला अटक केली, मग इथे का नाही?" बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:10 IST

बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांच्यावर हल्लाबोल

बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर RCB च्या विजयी मिरवणुकीपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर डझनावर लोक जखमी झाल आहेत. यावरू आता विरोधकांनी कर्नाटक सरकारला घेरले आहे. ही घटना म्हणजे, 'सरकारी अपयश' आणि 'राजकीय लालसे'चा परिणाम असल्याचे भाजपने म्हटले आहे. यासंदर्भात भाजपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ही केवळ चेंगराचेंगरीच नव्हती, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील भांडणातून निर्माण झालेली सरकारनिर्मित दुर्घटना होती."

राहुल गांधीवर थेट निशाणा - भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, "राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भारतीय लष्कराची खिल्ली उडवत असतात. मात्र, एका दुर्घटनेत एवढ्या लोकांचा मृत्यू झाला असताना राहुल गांधी कोठे आहेत?" एवढेच नाही तर, राहुल गांधी यांनी या संदर्भात तत्काळ कारवाई करावी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना दिल्लीला हजर राहण्याचे आदेश द्यावेत.

"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा" -पात्रा म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेत मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्री यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा. तसेच, डीके शिवकुमार  यांनी जनतेची माफी मागायला हवी.

“लोक मरत होते आणि तेथे उत्सव सुरू होता” -दुर्घटनेदरम्यान झालेल्या निष्काळजीपणासंदर्भात बोलतान भाजपने म्हटले आहे की, "जेव्हा लोक मरत होते, तेव्हा तेथे उत्सव साजरा केला जात होता. आजही 50 लोक रुग्णालयात दाखल आहेत."

"3 लाख लोक पोहोचलेच कसे?"दुर्घटनेसंदर्भात भाष्य करताना, "तेथे 300000 लोक कसे पोहोचले? त्यांना परवानगी दिली गेली होती? जर पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, तर ही विजयी मिरवणूक निघली कशी? असे प्रश्नही भाजपने उपस्थित केले आहेत.

"तेव्हा अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली, तर मग इथे का नाही?" -यावेळी भाजपने गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता अल्लू अर्जुनसोबत घडलेल्या प्रसंगाची आठवण करून देत, अभिनेता अल्लू अर्जुनला चेंगरा चेंगरीच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. तर मग या प्रकरणात डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यावर कार्रवाई का होऊ नये? असा सवालही भाजपने केला आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी