शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

RBI Monetary Policy: व्याज दरात कसल्याही प्रकारचा बदल नाही, GDP ग्रोथ -7.5 टक्के राहण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 1:11 PM

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पत धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली -भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पत धोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, आरबीआयने रेपो रेटमध्ये कुठल्याही प्रकारचे बलदल केलेले नाहीत. या शिवाय रिझर्व्ह रेपो रेटमध्येही कसल्याही प्रकारचे बलद करण्यात आलेले नाहीत. आरबीआयने रेपो रेट 4 टक्क्यांवरच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर रिव्हर्स रेपो रेटदेखील 3.35 टक्क्यांवर ठेवण्यात आला आहे. आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कसलाही बदल न केल्याची ही सलग तिसरी वेळ आहे. याशिवाय या वर्षी जीडीपी ग्रोथ -7.5% राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पत धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 2021साठी जीडीपी वाढीचा दर -7.5 टक्के असेल, असा अंदाज वर्तवला आहे.

दास म्हणाले, ग्रामीण आणि शहरी भागातील मागणीत सुधार झाल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील मागणीमुळे आणखी बळकटी मिळण्याची आशा आहे. तसेच शहरी भागातील मागणीही वाढत आहे. याशिवाय, MSF रेट आणि बँक रेटमध्येही कसल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. हा रेटही 4.25 टक्क्यांवर जशास तसा ठेवण्यात आला आहे. 

शक्तीकांत दास म्हणाले, अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा अधिक चांगली सुधारणा होताना दिसत आहे. तसेच ही सुधारणा ग्रामीण आणि शहरी, अशा दोन्ही भागांत होताना दिसत आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणा पाहता रिझर्व्ह बँकेने जीडीपीसंदर्भातील आपल्या अंदाजात सुधारणा केली आहे. रिझर्व बँकेने ऑक्टोबरमध्ये आर्थिक वर्ष 2020-21मध्ये जीडीपी वृद्धि दरात 9.5 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला होता.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकreporterवार्ताहरEconomyअर्थव्यवस्था