शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

नोटाबंदीने काळ्या पैशाला चाप बसणार नाही, RBI ने दिला होता मोदींना इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 16:33 IST

नोटाबंदीच्या निर्णयाने काळ्या पैशाला आळा बसणार नाही असा इशारा आरबीआय बोर्ड सदस्यांनी नरेंद्र मोदी यांना दिला होता. तरीही नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर देशभरात 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या होत्या. नरेंद्र मोदी सरकारने हा घेतलेल्या या निर्णयाला ऐतिहासिक निर्णय म्हटलं जातं होतं. मात्र नोटाबंदीच्या निर्णयावर आरबीआयचे बोर्ड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. 

टाइम्स ऑफ इंडीया यांनी दिलेल्या वृत्तानुसार 8 नोव्हेंबर 2016 रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता आरबीआय बोर्डाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारने आरबीआयला सांगितल्याप्रमाणे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात बाजारात चलनात आल्या आहेत या मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र बोर्डातील सदस्यांनी महागाईच्या तुलनेत वाढलेल्या चलनाचं प्रमाण नगण्य आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले. 

केंद्र सरकारने 2011-12 या वर्षीच्या तुलनेत 2015-16 या कालावधीत अर्थव्यवस्थेत 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यावेळी 500 रुपयांच्या 76 टक्के आणि 1000 रुपयांच्या 109 टक्के वाढ झाली होती. त्यामुळे जवळपास 400 करोड बनावट नोटा बाजारात चलनात आल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला. मात्र बोर्ड सदस्य केंद्र सरकारच्या अंदाजावर असहमती दर्शवली. आरबीआय बोर्डाच्या सदस्यांनी सांगितले की, काळा पैसा हा रोख स्वरुपात न वापरता सोने आणि मालमत्तेच्या रुपात गुंतवणूक केली जाते. त्यामुळे नोटबंदीमुळे काळ्या पैशाला आळा बसण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतील असं मतं बैठकीत मांडण्यात आले होते.  

 

या बैठकीला कोण कोण उपस्थित होते ?उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आरबीआय बोर्डाची बैठक झाली. या बैठकीत आरबीआयचे विद्यमान गर्व्हनर शक्तिकांत दास, आर गांधी, एसएस मुंदडा सहभागी होते.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयावर विरोधकांपासून अर्थतज्ज्ञांनीही नाराजी व्यक्त केली होती. नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्थ डबघाईला आली असा आरोप विरोधकांनी केला होता.तर नोटबंदीचे समर्थन करत केंद्र सरकारने नोटबंदीमुळे काळा पैशाला आळा बसला, दहशतवाद रोखण्यासाठी नोटबंदीचा फायदा झाला असल्याचा दावा केला. मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाली असताना नोटबंदीच्या निर्णयावरून पुन्हा मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करतील हे नक्की

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Demonetisationनिश्चलनीकरणReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदी