शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

नोटाबंदीने काळ्या पैशाला चाप बसणार नाही, RBI ने दिला होता मोदींना इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 16:33 IST

नोटाबंदीच्या निर्णयाने काळ्या पैशाला आळा बसणार नाही असा इशारा आरबीआय बोर्ड सदस्यांनी नरेंद्र मोदी यांना दिला होता. तरीही नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर देशभरात 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या होत्या. नरेंद्र मोदी सरकारने हा घेतलेल्या या निर्णयाला ऐतिहासिक निर्णय म्हटलं जातं होतं. मात्र नोटाबंदीच्या निर्णयावर आरबीआयचे बोर्ड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. 

टाइम्स ऑफ इंडीया यांनी दिलेल्या वृत्तानुसार 8 नोव्हेंबर 2016 रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता आरबीआय बोर्डाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारने आरबीआयला सांगितल्याप्रमाणे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात बाजारात चलनात आल्या आहेत या मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र बोर्डातील सदस्यांनी महागाईच्या तुलनेत वाढलेल्या चलनाचं प्रमाण नगण्य आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले. 

केंद्र सरकारने 2011-12 या वर्षीच्या तुलनेत 2015-16 या कालावधीत अर्थव्यवस्थेत 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यावेळी 500 रुपयांच्या 76 टक्के आणि 1000 रुपयांच्या 109 टक्के वाढ झाली होती. त्यामुळे जवळपास 400 करोड बनावट नोटा बाजारात चलनात आल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला. मात्र बोर्ड सदस्य केंद्र सरकारच्या अंदाजावर असहमती दर्शवली. आरबीआय बोर्डाच्या सदस्यांनी सांगितले की, काळा पैसा हा रोख स्वरुपात न वापरता सोने आणि मालमत्तेच्या रुपात गुंतवणूक केली जाते. त्यामुळे नोटबंदीमुळे काळ्या पैशाला आळा बसण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतील असं मतं बैठकीत मांडण्यात आले होते.  

 

या बैठकीला कोण कोण उपस्थित होते ?उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आरबीआय बोर्डाची बैठक झाली. या बैठकीत आरबीआयचे विद्यमान गर्व्हनर शक्तिकांत दास, आर गांधी, एसएस मुंदडा सहभागी होते.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयावर विरोधकांपासून अर्थतज्ज्ञांनीही नाराजी व्यक्त केली होती. नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्थ डबघाईला आली असा आरोप विरोधकांनी केला होता.तर नोटबंदीचे समर्थन करत केंद्र सरकारने नोटबंदीमुळे काळा पैशाला आळा बसला, दहशतवाद रोखण्यासाठी नोटबंदीचा फायदा झाला असल्याचा दावा केला. मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाली असताना नोटबंदीच्या निर्णयावरून पुन्हा मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करतील हे नक्की

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Demonetisationनिश्चलनीकरणReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदी