शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

२०१४ नंतर बँकांची ५ ट्रिलियन रुपयांची फसवणूक; केंद्र सरकार सपशेल अपयशी; काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 19:01 IST

फसवणूक होण्यापासून रोखण्यास केंद्राला अपयश, काँग्रेसची टीका. रकमेची वसुली करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत, काँग्रेसचा सवाल

ठळक मुद्देफसवणूक होण्यापासून रोखण्यास केंद्राला अपयश, काँग्रेसची टीका.रकमेची वसुली करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत, काँग्रेसचा सवाल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) २०२०-२१ च्या वार्षिक अहवालाच्या आधारावरून काँग्रेसनं भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसंच २०१४ नंतब बँकांची ५ ट्रिलिअन रूपयांची फसवणूक झाली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. बँकांची होणारी फसवणूक रोखण्यापासून सरकारला का अपयश आलं आणि ही रक्कम वसूल करण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलत आहेत असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत गौरव वल्लभ यांनी आपल्याला आवश्यक काय आहे हे अशी विचारणा केली. "आपल्याला काय आवश्यक आहे? अर्थव्यवस्था वाचवणं, लोकांचे जीव वाचवणं की मोदी महाल उभारणं. हे आर्थिक आणि नैतिकतेच्या दृष्टीनं योग्य ठरू शकत नाही. तुम्ही केवळ तुमची जिद्द पूर्ण करत आहात," असं गौरव वल्लभ म्हणाले. "नुकताच २०२१-२१ साठी रिझर्व्ह बँकेनं आपला अहवाल सादर केला. यात अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबाबत आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. यात बँकांची फसवणूक झाल्याची आकडेवारीही आहे. यामध्ये २०१४-१५ नंतर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केवळ २०२१-२१ मध्ये १.३८ लाख कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. २०१४-१५ च्या तुलनेत फसवणूकीची रक्कम २०१४-१५ आणि २०१९-२० दरम्यान ५७ टक्क्यांच्या दरानं वाढली," असं त्यांनी नमूद केलं. सरकार अपयशी का ठरलं?"गेल्या सात वर्षांमध्ये मोदी सरकार बँकांची होणारी फसवणूक रोखण्यात का अपयशी ठरलं. ही रक्कम परत आणण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली? बँकिंग व्यवस्थेला कमकुवत करणाऱ्यांकडून आतापर्यंत किती पैसे वसूल करण्यात आले?," असे सवाल गौरव वल्लभ यांनी केले. जर या रकमेची वसुली झाली तर गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजा रूपयांची मदत देता येऊ शळकते. देशात ५०० एम्स रुग्णालयं सुरू केली जाऊ शकतात आणि सामान्य लोकांनाही करात मदत मिळू शकते असं ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीbankबँकfraudधोकेबाजी