शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

दोन हजाराच्या नोटेवरून आरोप-प्रत्यारोप, काँग्रेस म्हणाली- बंद करायचीच होती मग आणली कशाला, भाजपने सांगितले फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 10:23 IST

RBI ने २००० रुपयांची नोट चलनातून बंद करण्याची घोषणा केली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

शुक्रवारी (१९ मे) संध्याकाळी धक्कादायक निर्णय घेत आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध मानल्या जातील, असे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर आरोप-प्रत्योराप सुरू झाले. यामध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे.

कर्नाटकात शक्तिप्रदर्शन; सिद्धरामय्या, शिवकुमार आज घेणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ

आरबीआयच्या नोटबंदीच्या निर्णयावर काँग्रेसनेही टीका केली. नोटा बंद करायच्या होत्या मग कशा आणल्या. काँग्रेससह विरोधी पक्षांचे नेते मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत, तर भाजपचे मंत्री आणि नेते याला योग्य वेळी योग्य निर्णय म्हणत आहेत. यासोबतच भाजप नेते या नोटाबंदीचे फायदे सांगत आहेत. भाजप याला काळ्या पैशांविरोधात आणखी एक मोठी कारवाई म्हणत आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, जर २००० रुपयांची नोट बंदी करायची होती, तर ती का आणली गेली? २००० ची नोट आधीपासून चलनात आली नसेल तर यावरही उत्तर द्यायला हवे. दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून कशा गायब झाल्या हेही सरकारने सांगावे, असंही ते म्हणाले.

गेहलोत यांनी मोदी सरकारवर आरोप केला की त्यांच्याकडून आधीच चुका झाल्या आहेत. आता पुन्हा त्यांच्याकडून चूक झाली आहे, आधी नोटाबंदी वेळ न देता करण्यात आली होती आणि आता 2000 रुपयांच्या नोटेवरही बंदी घालण्यात आली आहे.

काँग्रेस नेते राजीव शुक्ला म्हणाले की, अशा निर्णयांमुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्याऐवजी कमकुवत होते. काँग्रेस नेते गौरव बल्लभ म्हणाले की, भाजपने विचार न करता २००० ची नोट बाजारात आणली, आता ती बंद करत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळेच २००० रुपयांच्या नोटांवर बंदी आणली आहे. २००० च्या नोटांवर बंदी आली, दहशतवाद आणि भ्रष्टाचार संपला का?

नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचे सांगताना भाजप नेते सुशील मोदी म्हणाले की, काळ्या पैशावरील हा दुसरा सर्जिकल स्ट्राइक आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. असे निर्णय राष्ट्रहितासाठी घेतले जातात.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा