शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

दोन हजाराच्या नोटेवरून आरोप-प्रत्यारोप, काँग्रेस म्हणाली- बंद करायचीच होती मग आणली कशाला, भाजपने सांगितले फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 10:23 IST

RBI ने २००० रुपयांची नोट चलनातून बंद करण्याची घोषणा केली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

शुक्रवारी (१९ मे) संध्याकाळी धक्कादायक निर्णय घेत आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध मानल्या जातील, असे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर आरोप-प्रत्योराप सुरू झाले. यामध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे.

कर्नाटकात शक्तिप्रदर्शन; सिद्धरामय्या, शिवकुमार आज घेणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ

आरबीआयच्या नोटबंदीच्या निर्णयावर काँग्रेसनेही टीका केली. नोटा बंद करायच्या होत्या मग कशा आणल्या. काँग्रेससह विरोधी पक्षांचे नेते मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत, तर भाजपचे मंत्री आणि नेते याला योग्य वेळी योग्य निर्णय म्हणत आहेत. यासोबतच भाजप नेते या नोटाबंदीचे फायदे सांगत आहेत. भाजप याला काळ्या पैशांविरोधात आणखी एक मोठी कारवाई म्हणत आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, जर २००० रुपयांची नोट बंदी करायची होती, तर ती का आणली गेली? २००० ची नोट आधीपासून चलनात आली नसेल तर यावरही उत्तर द्यायला हवे. दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून कशा गायब झाल्या हेही सरकारने सांगावे, असंही ते म्हणाले.

गेहलोत यांनी मोदी सरकारवर आरोप केला की त्यांच्याकडून आधीच चुका झाल्या आहेत. आता पुन्हा त्यांच्याकडून चूक झाली आहे, आधी नोटाबंदी वेळ न देता करण्यात आली होती आणि आता 2000 रुपयांच्या नोटेवरही बंदी घालण्यात आली आहे.

काँग्रेस नेते राजीव शुक्ला म्हणाले की, अशा निर्णयांमुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्याऐवजी कमकुवत होते. काँग्रेस नेते गौरव बल्लभ म्हणाले की, भाजपने विचार न करता २००० ची नोट बाजारात आणली, आता ती बंद करत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळेच २००० रुपयांच्या नोटांवर बंदी आणली आहे. २००० च्या नोटांवर बंदी आली, दहशतवाद आणि भ्रष्टाचार संपला का?

नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचे सांगताना भाजप नेते सुशील मोदी म्हणाले की, काळ्या पैशावरील हा दुसरा सर्जिकल स्ट्राइक आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. असे निर्णय राष्ट्रहितासाठी घेतले जातात.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा