शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

उंदीरमामा (आरोपीच्या) पिंजऱ्यात... म्हणे, २०० बीअर कॅन केले 'खल्लास'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 14:50 IST

बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्यात आली आहे. येथे दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण दारूचे व्यसन असणारी मंडळी कसाही जुगाड करून दारूपर्यंत पोहोचतातच.

नवी दिल्ली - बिहारमध्येदारूबंदी लागू करण्यात आली आहे. येथे दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण दारूचे व्यसन असणारी मंडळी कसाही जुगाड करून दारूपर्यंत पोहोचतातच. बिहारमध्ये छापेमारीच्या सत्रात बहुतांश वेळेस दारू जप्त केली जाते. येथे अवैधरित्या विक्री करण्यात येणारी दारू गोदामामध्ये ठेवली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भभुआ शहरातही अवैधरित्या दारूची विक्री केल्या जाणाऱ्या गोदामावर उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला. मात्र या कारवाईमध्ये जवळपास 200 बिअरच्या मोठ्या कॅनमधून सर्व बिअर अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले.   

दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर बिहार पोलिसांकडून ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहेत. अवैधरित्या साठा करुन ठेवलेल्या दारुच्या गोदामावर छापा मारुन दारू नष्ट केली जात आहे. पण भभुआतील जरा विचित्रच प्रकरण समोर आले आहे. ज्या गोदामात बिअर ठेवली होती, ती नष्ट करण्यासाठी प्रशासनाचे एक पथक तेथे पोहोचले. मात्र बिअरचे सर्व कॅन त्यांना चक्क रिकामीच आढळले. तपास पथकानं चौकशी केल्यानंतर अजब-गजब उत्तरच त्यांना मिळालं. बिअरचे एवढे सर्व कॅन उंदरांनी रिकामे केली, असं भलतच उत्तर तपास पथकाला मिळालं. 

भभुआ जिल्ह्याचे डीएम अनुपम कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जप्त केलेली दारू नष्ट करण्यासाठी मोहीम चालवण्यात आली, तेव्हा हे प्रकरण समोर आले. प्रशासकीय पथक जेव्हा गोदामात दाखल झालं तेव्हा त्यांना सर्व कॅन्सना छिद्र पडलेली आढळली.जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षकांनुसार, 'कॅन्सना छिद्र पडल्यानं त्यातून बियरची गळती झाली. पण ही प्राथमिक माहिती असून अद्यापपर्यंत ठोस अशी माहिती समोर आलेली नाही'.

दरम्यान, गेल्या वर्षीही लाखो लिटर दारू गोदामांमधून गायब झाली होती, त्यावेळेसही उंदरांवरच दारू फस्त करण्याचा आरोप करण्यात आला होता.

टॅग्स :liquor banदारूबंदीBiharबिहारCrime Newsगुन्हेगारी