शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

उंदीरमामा (आरोपीच्या) पिंजऱ्यात... म्हणे, २०० बीअर कॅन केले 'खल्लास'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 14:50 IST

बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्यात आली आहे. येथे दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण दारूचे व्यसन असणारी मंडळी कसाही जुगाड करून दारूपर्यंत पोहोचतातच.

नवी दिल्ली - बिहारमध्येदारूबंदी लागू करण्यात आली आहे. येथे दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण दारूचे व्यसन असणारी मंडळी कसाही जुगाड करून दारूपर्यंत पोहोचतातच. बिहारमध्ये छापेमारीच्या सत्रात बहुतांश वेळेस दारू जप्त केली जाते. येथे अवैधरित्या विक्री करण्यात येणारी दारू गोदामामध्ये ठेवली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भभुआ शहरातही अवैधरित्या दारूची विक्री केल्या जाणाऱ्या गोदामावर उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला. मात्र या कारवाईमध्ये जवळपास 200 बिअरच्या मोठ्या कॅनमधून सर्व बिअर अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले.   

दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर बिहार पोलिसांकडून ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहेत. अवैधरित्या साठा करुन ठेवलेल्या दारुच्या गोदामावर छापा मारुन दारू नष्ट केली जात आहे. पण भभुआतील जरा विचित्रच प्रकरण समोर आले आहे. ज्या गोदामात बिअर ठेवली होती, ती नष्ट करण्यासाठी प्रशासनाचे एक पथक तेथे पोहोचले. मात्र बिअरचे सर्व कॅन त्यांना चक्क रिकामीच आढळले. तपास पथकानं चौकशी केल्यानंतर अजब-गजब उत्तरच त्यांना मिळालं. बिअरचे एवढे सर्व कॅन उंदरांनी रिकामे केली, असं भलतच उत्तर तपास पथकाला मिळालं. 

भभुआ जिल्ह्याचे डीएम अनुपम कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जप्त केलेली दारू नष्ट करण्यासाठी मोहीम चालवण्यात आली, तेव्हा हे प्रकरण समोर आले. प्रशासकीय पथक जेव्हा गोदामात दाखल झालं तेव्हा त्यांना सर्व कॅन्सना छिद्र पडलेली आढळली.जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षकांनुसार, 'कॅन्सना छिद्र पडल्यानं त्यातून बियरची गळती झाली. पण ही प्राथमिक माहिती असून अद्यापपर्यंत ठोस अशी माहिती समोर आलेली नाही'.

दरम्यान, गेल्या वर्षीही लाखो लिटर दारू गोदामांमधून गायब झाली होती, त्यावेळेसही उंदरांवरच दारू फस्त करण्याचा आरोप करण्यात आला होता.

टॅग्स :liquor banदारूबंदीBiharबिहारCrime Newsगुन्हेगारी