शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

देशात सर्वत्र बलात्कार, हे काय चाललंय? सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 14:10 IST

देशातील विविध भागातून समोर येत असलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकारांमुळे संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फैलावर घेतले असून

नवी दिल्ली  - देशातील विविध भागातून समोर येत असलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकारांमुळे संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फैलावर घेतले असून, देशातील सर्वच भागातून बलात्काराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. हे काय चालले आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.  बिहारमधील मुझफ्फरपूर आणि उत्तर प्रदेशमधील महिलाश्रमातील बलात्कार प्रकरणांची दखल घेतल्यानंतर मंगळवारी सुनावणीदरम्यान बलात्कार प्रकरणांवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची खरडपट्टी काढली. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल क्राईम ब्युरोचा हवाला देत सांगितले की, "देशात प्रत्येक सहा तासांमध्ये एका मुलीवर बलात्कार होत आहे. वर्षभरात देशामध्ये सुमारे 38 हजार बलात्कार झाले आहे. सर्वाधिक बलात्कार मध्य प्रदेशमध्ये होत आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे."यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील नितीश कुमार सरकारलाही मुझफ्फरपूर बलात्कार प्रकरणावरून फटकारले आहे. राज्य सरकार 2004 पासून महिलाश्रमांना निधी देत आहे. मात्र या आश्रमात काय चालले आहे. याची माहिती सरकारला नाही. या आश्रमांचे निरीक्षण करण्याची गरज सरकारला कधी वाटली नाही. हे सगळे राज्य सरकारच्या नजरेखाली होत असल्याचे वाटते. ही विचार करण्यासारखी बाब आहे." बिहारमधील शेल्टर होम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अपर्णा भट्ट यांना अमिकस क्युरी नियुक्त केले आहे. दरम्यान, अपर्णा भट्ट यांनी पीडित मुलींचे मुलीचे समुपदेशन सुरू असून, पीडित मुलींना अद्याप मदत मिळाली नसल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले.   

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRapeबलात्कारGovernmentसरकारIndiaभारत