शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

देशात सर्वत्र बलात्कार, हे काय चाललंय? सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 14:10 IST

देशातील विविध भागातून समोर येत असलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकारांमुळे संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फैलावर घेतले असून

नवी दिल्ली  - देशातील विविध भागातून समोर येत असलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकारांमुळे संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फैलावर घेतले असून, देशातील सर्वच भागातून बलात्काराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. हे काय चालले आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.  बिहारमधील मुझफ्फरपूर आणि उत्तर प्रदेशमधील महिलाश्रमातील बलात्कार प्रकरणांची दखल घेतल्यानंतर मंगळवारी सुनावणीदरम्यान बलात्कार प्रकरणांवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची खरडपट्टी काढली. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल क्राईम ब्युरोचा हवाला देत सांगितले की, "देशात प्रत्येक सहा तासांमध्ये एका मुलीवर बलात्कार होत आहे. वर्षभरात देशामध्ये सुमारे 38 हजार बलात्कार झाले आहे. सर्वाधिक बलात्कार मध्य प्रदेशमध्ये होत आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे."यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील नितीश कुमार सरकारलाही मुझफ्फरपूर बलात्कार प्रकरणावरून फटकारले आहे. राज्य सरकार 2004 पासून महिलाश्रमांना निधी देत आहे. मात्र या आश्रमात काय चालले आहे. याची माहिती सरकारला नाही. या आश्रमांचे निरीक्षण करण्याची गरज सरकारला कधी वाटली नाही. हे सगळे राज्य सरकारच्या नजरेखाली होत असल्याचे वाटते. ही विचार करण्यासारखी बाब आहे." बिहारमधील शेल्टर होम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अपर्णा भट्ट यांना अमिकस क्युरी नियुक्त केले आहे. दरम्यान, अपर्णा भट्ट यांनी पीडित मुलींचे मुलीचे समुपदेशन सुरू असून, पीडित मुलींना अद्याप मदत मिळाली नसल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले.   

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRapeबलात्कारGovernmentसरकारIndiaभारत