शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

'रामनाथ कोविंदही बायोडेटा घेऊन आलेले; शांत बसले म्हणून राष्ट्रपती झाले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 15:01 IST

उत्तर पश्चिम दिल्लीमधून भाजपाचे खासदार असलेले उदित राज यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नवी दिल्ली : उत्तर पश्चिम दिल्लीमधून भाजपाचे खासदार असलेले उदित राज यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या 24 तासांपासून सुरु असलेल्या घडामोडींनंतर त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी भाजपावर तोंडसुख घेत त्यांना दलितांची मते हवी मात्र दलित नेता नको असा आरोप केला. 

यावेळी त्यांनी भाजपाने जर तिकीट दिले असते तर त्यांच्याकडून लढलो असतो असे कबुलही केले. 2 एप्रिल 2018 मध्ये जेव्हा दलित रस्त्यांवर उतरले होते, तेव्हा मी त्यांना समर्थन दिले होते. या कारणावरून माझे तिकिट कापल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच 2014 मध्ये सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्याकडे बायोडेटा आले होते. माझ्यासाठी काहीतरी करा असे ते सांगत होते. त्यानाही निवडणुकीचे तिकिट हवे होते, मात्र दिले नाही. यावर ते शांत बसले म्हणून त्यांना राष्ट्रपती पद देण्यात आले. मी देखिल शांत बसलो असतो तर मलाही पंतप्रधान बनवले असते. मात्र, मी मुका आणि बहिरा बनून राहू शकत नाही, असा आरोपही त्यांनी केला. 

यापूर्वी त्यांनी ट्विटर खात्यावर लिहिले की जर मला आधीच सांगितले असते तर एवढा ताप झाला नसता. पक्षावर अशी का वेळ आली की अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी एक वाजता उमेदवारी घोषित करण्यात आली. आधीच सांगितले असते तर एवढा त्रास झालाच नसता. भाडेकरू आहे, ऐकावेच लागेल.

लोकसभेचे तिकिट मिळत नसल्याचे पाहून नाराज झालेल्या उदित राज यांनी मै भी चौकीदार अभियानावेळी ट्विटरवरील नावापुढे चौकीदार लिहिले होते. मात्र, काल त्यांनी नावापुढील चौकीदार काढून टाकले होते. नाराजी व्यक्त होताच प्रसारमाध्यमांमध्ये बोभाटा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा नावापुढे चौकीदार लिहिले होते. भाजपाकडून आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा चौकीदार लिहिले असल्याची चर्चा होती. 

उत्तर-पश्चिम दिल्लीमधून त्यांचे तिकिट कापून गायक हंस राज हंस यांना देण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता उदित राज यांना पुन्हा तिकिट न देणे भाजपाने ठरविलेले होते. उदित राज यांनीही काल सकाळी जर तिकिट न मिळाल्यास भाजपा सोडण्याची धमकी दिली होती. बुधवारी सकाळी असेच झाले. 

टॅग्स :north-east-delhi-pcउत्तर पूर्व दिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी