शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 16:25 IST

Ramdas Athawale on Supreme Court : भाजप खासदार निशिकांत दुबेंनी सर्वोच्च न्यायालयाबाबत केलेल्या वक्तव्याने वाद वाढला आहे.

Ramdas Athawale on Supreme Court : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याने मोठा वाद झाला आहे. यावरुन काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी भाजपवर टीका सुरू केली आहे. अशातच आता RPI प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीदेखील सर्वोच्च न्यायालयाबाबत अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे.  

'सर्वोच्च न्यायालयाचा आदर आहे, पण...'रामदास आठवले म्हणाले की, प्रत्येकाने न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे. न्यायपालिका जे काही आदेश देईल, ते पाळलेच पाहिजेत. पण न्यायव्यवस्थेने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, संसद सर्वोच्च आहे. कायदे करणे हे संसदेचे काम आहे. कायद्यानुसार निर्णय देणे हे न्यायव्यवस्थेचे काम आहे. संसदेने बनवलेल्या प्रत्येक कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य करणे योग्य नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, सर्वोच्च न्यायालयानेही संसदेचा आदर केला पाहिजे.

खासदार दुबेंच्या वक्तव्याने वादभाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. निशिकांत दुबे म्हणाले होते की, 'या देशात होणाऱ्या सर्व गृहयुद्धांसाठी भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत. जर सर्वोच्च न्यायालय कायदा करणार असेल, तर संसद भवन बंद केले पाहिजे,' असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजपला धारेवर धरले आहे. 

भाजपने हात झटकलेभाजप खासदाराच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सारवासारव केली. आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो. निशिकांत दुबे यांचे वक्तव्य त्यांचे वैयक्तिक असून, पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे नड्डांनी म्हटले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाcongressकाँग्रेस