शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस; हिंदू महासभेच्या नेत्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 10:28 IST

स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसमधील काही श्लोक कथितपणे भेदभाव करणारे म्हटल्यानंतर एक दिवसानंतर अखिल भारत हिंदू महासभेच्या एका नेत्याने त्यांची जीभ कापून टाकणाऱ्याला 51,000  रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

बिहारमधून सुरू झालेला रामचरितमानसचा वाद आता उत्तर प्रदेशात पोहोचला आहे. समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसच्या चौपाईला भेदभाव करणारी असल्याचे म्हणत त्यावर बंदी घालण्याची मागणी केलीआहे. यानंतर हिंदू महासभेच्या एका नेत्याने त्यांची जीभ कापणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा केली. दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसमधील काही श्लोक कथितपणे भेदभाव करणारे म्हटल्यानंतर एक दिवसानंतर अखिल भारत हिंदू महासभेच्या एका नेत्याने त्यांची जीभ कापून टाकणाऱ्याला 51,000  रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

"जर एखाद्या व्यक्तीने समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापली तर त्याला बक्षीस म्हणून 51,000 रुपयांचा धनादेश दिला जाईल. त्यांनी आमच्या धार्मिक ग्रंथाचा अपमान केला आहे. याचबरोबर, त्यांनी हिंदूंच्या भावनाही दुखावल्या आहेत", असे महासभेचे आग्रा जिल्हा प्रभारी सौरभ शर्मा म्हणाले. इतकेच नाही तर अखिल भारतीय हिंदू महासभेने सोमवारी आग्रा येथे स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विधानाचा निषेध केला.

दरम्यान, रामचरितमानसबाबत स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा त्यांच्याच समाजवादी पक्षाच्या आमदारांनी निषेध केला आहे.  या प्रकरणी पक्षप्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती देणार असल्याचे समाजवादी पक्षाच्या आमदारांनी सांगितले.  रामचरितमानस हा असा ग्रंथ आहे, जो जगभर वाचला जातो आणि विचार केला जातो, असे समाजवादी पक्षाचे नेते मनोज पांडे म्हणाले. 

याचबरोबर, समाजवादी पक्षाचे आमदार मनोज पांडे म्हणाले की, हे पुस्तक माणसाला नैतिक मूल्ये आणि परस्पर संबंधांचे महत्त्व सांगते. आम्ही केवळ रामचरितमानसच नाही तर बायबल, कुराण आणि गुरु ग्रंथ साहिब यांचाही तितकाच आदर करतो.  हे ग्रंथ आपल्याला सर्वांसोबत राहायला शिकवतात. तसेच, अखिलेश यादव सध्या उत्तराखंडमध्ये आहेत आणि त्यांना याची जाणीव आहे.

काय म्हणाले होते स्वामी प्रसाद मौर्य?"रामचरितमानसच्या काही श्लोकांमध्ये जात, वर्ण आणि वर्गाच्या आधारावर समाजातील कोणत्याही घटकाचा अपमान केला गेला असेल तर तो धर्म नसून अधर्म आहे.  यामुळे केवळ भाजपलाच नव्हे, तर साधूसंतांवरही हल्ले करण्यास प्रवृत्त केले जाते.  रामचरितमानसच्या काही ओळींमध्ये तेली, कुम्हार यांसारख्या जातींची नावे सांगितल्यामुळे या जातींच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात", असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले होते. दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुस्तकाच्या या भागावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टी