शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम कमकुवत; गुणवत्ता चाचणीत माहिती उघड

By मोरेश्वर येरम | Updated: December 25, 2020 10:06 IST

तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील सर्वोत्तम संस्था असलेल्या आयआयटी, एनआयटी आणि केंद्रीय इमारत संशोधन संस्था (सीबीआरआय) यांच्या मार्गदर्शनाखाली राम मंदिराच्या रचनेवर काम होत आहे.

ठळक मुद्देराम मंदिराच्या बांधकामात त्रृटी आढळल्याची धक्कादायक माहिती उघडअपेक्षित गुणवत्तेनुसार काम होत असल्याचं चाचणीत स्पष्टराम मंदिराच्या पायाचे अपेक्षित क्षमतेनुसार बांधकाम झालं नाही

लखनऊअयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात एक विघ्न निर्माण झालं आहे. वजनाचा भार सहन करण्याच्या अपेक्षित क्षमतेच्या चाचणीमध्ये मंदिराचं बांधकाम नापास ठरलं आहे, अशी माहिती खुद्द श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली आहे. 

बाबरी मशिदीच्या वादग्रस्त प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच संबंधित जागेवर राम मंदिराची उभारणी केली जात आहे. पण बांधकामात त्रृटी समोर आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता या त्रृटी दूर करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधले जात आहेत.

तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील सर्वोत्तम संस्था असलेल्या आयआयटी, एनआयटी आणि केंद्रीय इमारत संशोधन संस्था (सीबीआरआय) यांच्या मार्गदर्शनाखाली राम मंदिराच्या रचनेवर काम होत आहे. तर 'एल अँड टी', टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स यासारख्या नामवंत कंपन्यांचे इंजिनिअर्स यावर काम करत आहेत. 

राम मंदिराच्या प्रस्तावित जागेच्या गर्भगृहाच्या पश्चिमेकडे पाणी वाहू लागल्याने जमिनीची प्रत खालावली असून सैल वाळूसारखी जमीन झाल्याचं संकट इंजिनिअर्ससमोर उभं राहीलं आहे. 

मंदीराच्या पायाच्या बांधकामाचे डिझाइन 'एल अँड टी'ने याआधीच सादर केले असून यात जमिनीत २० ते ४० मीटर खोल आणि सुमारे १ मीटर व्यासाचे १२०० सिमेंट काँक्रीटचे पाइल्स उभारले जाणार आहेत. 

नेमक्या त्रृटी कशात?"निश्चित करण्यात आलेल्या आराखड्यानुसार एकूण १२०० खांब जमिनीत उभारले जाणार आहेत. यातील काही खांब जमिनीत १२५ फूट खोल उभारले जाणार आहेत आणि बांधकामाच्या निषकांनुसार याची २८ दिवसांनंतर आम्ही तपासणी केली. भूकंप सदृष परिस्थिती निर्माण करण्यासोबतच खांबांवर ७०० टन वजन ठेवण्यात आले. पण यातून आम्हाला अपेक्षित निकाल हाती लागला नाही. चाचणीत थोडाफार फरक असता तर निभावून नेता आलं असतं पण खूप मोठा फरक जाणवला आहे", असं श्री राम मंदीर जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले. 

प्रकल्प व्यवस्थापनाचं स्पष्टीकरण"केवळ खांब आणि पाइलिंग भार पेलण्यासाठी सक्षम नाही हे आमच्या लक्षात आलं असून इतर पर्यायांचा विचार केला जात आहे", असं प्रकल्प व्यवस्थापक जगदीश अफाळे यांनी सांगितलं. 

"मंदीराच्या पायाच्या रचनेबाबत सर्व तंत्रज्ञांसोबत बैठक झाली असून या महिन्या अखेरपर्यंत यावर मार्ग काढला जाईल. त्यानंतर राम मंदीर ट्रस्टसमोर योजना सादर केली जाईल आणि त्यांच्या मंजुरीनंतरच पुढील कामाला सुरुवात होईल. संपूर्ण प्रकल्पाची योजना पूर्णत्वास आल्याशिवाय आम्ही कामाला सुरुवात करू शकत नाही. पुढील किमान हजार वर्षांपर्यंत बांधकाम पक्क राहील अशापद्धतीची योजना आखण्याचं काम अजूनही सुरू आहे", असंही जगदीश म्हणाले आहेत. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या