शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

राम मंदिर आमच्या अजेंड्यावर नाही, भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 06:44 IST

पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने खळबळ माजताच, शहा यांनी तसे म्हटले नव्हते

नवी दिल्ली/हैदराबाद : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने खळबळ माजताच, शहा यांनी तसे म्हटले नव्हते आणि राम मंदिराचा विषय आमच्या अजेंड्यावरही नाही, असे भाजपाला जाहीर करावे लागले आहे.अध्यक्षांच्या विधानावरच खुलासा करण्याची वेळ आल्याने भाजपामध्ये नाराजी दिसत आहे. हैदराबादमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत शहा यांनी तसे विधान केल्याची माहिती भाजपा नेते पी. शेखर यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्या वेळी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होईल, त्यासाठीची तयारी सुरू आहे, असे अमित शहा म्हणाल्याचे शेखर यांनी पत्रकारांना सांगितले होते.त्यावर एमआयएमचे नेते असाउद्दिन ओवेसी यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर वादाबाबत निवाडा द्यायला हवा, असे मत व्यक्त केले होते. निवडणुकांआधी निकाल लागल्यास भाजपा त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले होते.>संत, महंतांची समजूत काढण्याचे प्रयत्नउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्याच आठवड्यात नाराज संत-महंतांची समजूत काढण्यासाठी अयोध्येत राम मंदिर नक्की होईल, पण त्यासाठी काही दिवस धीर धरा, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपा पुन्हा राम मंदिराचा मुद्दा पुढे आणण्याच्या तयारीत असल्याचे जाणवत आहे. दरवेळी निवडणुकांच्या आधी भाजपा राम मंदिराचा विषय उपस्थित करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भाजपा आता अडचणीत असल्याने तो मुद्दा बाहेर आणत आहे, अशी टीका शहा यांच्या वक्तव्यामुळे सुरू होताच, भाजपाने बचावात्मक पवित्रा घेतला. अमित शहा यांनी हैदराबादेत तसे विधान केलेच नव्हते, प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असा खुलासा दिल्लीतून केला गेला.भाजपाने २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या आधीही अयोध्येत राम मंदिर उभारण्याची घोषणा केली होती. ती पूर्ण न केल्याने अनेक संत-महंत भाजपावर नाराज आहेत. त्यांनी ती नाराजी बोलूनही दाखविली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू मते एकगठ्ठा मिळविण्यासाठीच भाजपाने हा मुद्दा आणल्याची चर्चा आहे. आपण आश्वासन पूर्ण करण्याच्या तयारीला लागल्याचेही भाजपाला दाखवायचे आहे.>मग राम मंदिर का नाही? ठाकरेपुणे : नोटाबंदी एका क्षणात केली, मग राम मंदिर का नाही करीत, असा सवाल करतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा हा फसव्या घोषणा करणारा पक्ष आहे, अशी टीका केला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRam Mandirराम मंदिरBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ