रामनवमीच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधी अयोध्येला कधी येणार, यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. दिग्विजय सिंह म्हणाले, "प्रत्येक व्यक्ती येथे तेव्हाच येते जेव्हा त्यांना देवाचं बोलावणं येतं. मला बोलावणं आलं म्हणूनच मी येथे आलो. दर्शन घेऊन चांगलं वाटत आहे."
"जर श्रीरामाचं दर्शन घ्यायला तुम्ही येणार असाल तर हनुमानाचं दर्शनही घ्यायलाच हवं. काँग्रेसमध्ये प्रत्येक व्यक्ती आपापल्या श्रद्धेनुसार धर्माचं पालन करते. आम्ही धर्माचा वापर व्यापार किंवा राजकारणासाठी करत नाही. धर्माचा राजकीय गैरवापर होऊ नये आणि त्याचा व्यापारासाठीही वापर केला जाऊ नये. काँग्रेसमध्ये प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार धर्माच्या मार्गावर चालतो."
रामनवमीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांनी कधीही राम मंदिर उभारणीला विरोध केला नव्हता. "मी स्वतः मंदिर निर्माणासाठी १ लाख ११ हजार रुपयांची देणगी दिली आहे," अशी आठवणही त्यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले की, "प्रभू रामाचे दर्शन घ्यायला माणूस तेव्हाच येतो जेव्हा देवाचं बोलावणं येतं. मला बोलावणं आलं आणि म्हणून मी आलो."
राहुल गांधींबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, जेव्हा त्यांना बोलावणं येईल, तेव्हा ते नक्कीच येतील, ते का येणार नाहीत? काँग्रेसमधील प्रत्येक व्यक्ती आपापल्या श्रद्धेनुसार धर्माचं पालन करते. आपला धर्म कोणताही असो, मग तो हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन किंवा पारसी असो, प्रत्येक व्यक्ती आपापल्या श्रद्धेनुसार धर्माशी संबंधित असतो. पण याचा कोणत्याही प्रकारे राजकीय गैरवापर केला जाऊ नये.
मध्यपूर्वेतील युद्धग्रस्त देशांमधील परिस्थितीबद्दल विचारले असता, दिग्विजय सिंह म्हणाले की, तुम्ही सध्याची परिस्थिती स्वतःच पाहत आहात. पेट्रोल पंपांवर आणि एलपीजी सिलिंडर खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
Web Summary : Digvijaya Singh visited Ayodhya, stating Rahul Gandhi will come when called. He emphasized personal faith, donating to the temple, and warned against exploiting religion for politics or business.
Web Summary : दिग्विजय सिंह अयोध्या पहुंचे और कहा कि राहुल गांधी को बुलाने पर आएंगे। उन्होंने व्यक्तिगत आस्था पर जोर दिया, मंदिर को दान दिया और धर्म का राजनीतिक या व्यावसायिक शोषण के खिलाफ चेतावनी दी।