शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: आम्ही पुन्हा येऊ! शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही: राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 13:12 IST

Farmers Protest: शेतकरी आता आपापल्या गावी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देराकेश टिकैत यांचा पुन्हा एकदा केंद्राला थेट इशाराशेतकरी आंदोलन सुरूच राहणार - टिकैतआम्ही चर्चेसाठी तयार, सरकारने निमंत्रण द्यावे - टिकैत

नवी दिल्ली: गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) दिल्लीतील विविध सीमांवर सुरू आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दिल्लीतील गंभीर परिस्थिती यांमुळे आंदोलक शेतकरी आता आपापल्या गावी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही पुन्हा येणार आहोत. शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही, असा निर्धात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. (rakesh tikait says this is not shaheen bagh farmers protest continue and crowd will come again)

राजधानी दिल्ली आणि परिसरात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या ४ महिन्यापासून आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांनीही काढता पाय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा दावा राकेश टिकैत यांनी केला असला तरी, सीमेवर आंदोलनस्थळी परिस्थिती मात्र वेगळीच आहे. यूपी गेट परिसरात हजारोंच्या संख्येने काही महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनास बसले होते. मात्र सध्याची परिस्थिती बदलली आहे. येथील शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही, आम्ही पुन्हा येऊ, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. 

भाजप नेतेही आमच्यासोबत, आता किसान मुक्ती अभियान: राकेश टिकैत

कायदे मागे घेतल्याशिवाय माघार नाही

केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलक शेतकरी माघार घेऊन घरी जाणार नाहीत. सध्या सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त आहे. कापणीचा काळ असल्याने शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी घरी परतत आहेत. सरकार दिल्लीत परत आले की, शेतकरीही परत येतील, असे टिकैत यांनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आंदोलन सुरूच राहील, असे टिकैत यांनी स्पष्ट केले. 

सरकारने चर्चेसाठी निमंत्रित करावे

केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकरी नेते, प्रतिनिधींना चर्चेसाठी निमंत्रित केले पाहिजे. २२ जानेवारी रोजी ज्या स्थितीत चर्चा होती. ती पुन्हा तिथूनच सुरू झाली पाहिजे. कृषी कायदे मागे घ्यावेत. तसेच एमएसपीवर कायदा करावा, अशा मागण्यांवर शेतकरी अजूनही ठाम आहेत, असे टिकैत यांनी नमूद केले आहे. लॉकडाऊन लागला, तरी शेतकरी आपल्या जागेवरून हलणार नाहीत. कृषी कायदे मागे घेत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहणार आहे. देशात आपात्कालिन कर्फ्यू लावण्यात आला किंवा कोणतीही आपात्कालिन परिस्थिती उद्भवली तरी शेतकरी मागे हटणार नाहीत, असा इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला.

भाजपचा विजय आता ममता दीदींनाही दिसतोय; कुचबिहार हिंसेवरून मोदींची टीका

दरम्यान, यूपी गेट परिसरात शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आताच्या घडीला येथे लावण्यात आलेले बहुतांश टेंट रिकामे झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी फ्लायओव्हरखाली, दिल्ली-मेरठ हायवेवर अनेक ठिकाणी टेंट लावले होते. या परिसरात २५ मोठे, ७० मध्यम आणि १०० छोटे टेंट लावण्यात आले होते. १७ ठिकाणी लंगर चालू होते. सध्या येथे ३०० ते ४०० आंदोलनकर्ते शेतकरी राहिले आहेत. त्यातील १००  शेतकरी आसपासच्या गावातील आहेत. जे आंदोलनस्थळी येऊन-जाऊन असतात.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या