शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Farmers Protest: आम्ही पुन्हा येऊ! शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही: राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 13:12 IST

Farmers Protest: शेतकरी आता आपापल्या गावी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देराकेश टिकैत यांचा पुन्हा एकदा केंद्राला थेट इशाराशेतकरी आंदोलन सुरूच राहणार - टिकैतआम्ही चर्चेसाठी तयार, सरकारने निमंत्रण द्यावे - टिकैत

नवी दिल्ली: गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) दिल्लीतील विविध सीमांवर सुरू आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दिल्लीतील गंभीर परिस्थिती यांमुळे आंदोलक शेतकरी आता आपापल्या गावी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही पुन्हा येणार आहोत. शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही, असा निर्धात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. (rakesh tikait says this is not shaheen bagh farmers protest continue and crowd will come again)

राजधानी दिल्ली आणि परिसरात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या ४ महिन्यापासून आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांनीही काढता पाय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा दावा राकेश टिकैत यांनी केला असला तरी, सीमेवर आंदोलनस्थळी परिस्थिती मात्र वेगळीच आहे. यूपी गेट परिसरात हजारोंच्या संख्येने काही महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनास बसले होते. मात्र सध्याची परिस्थिती बदलली आहे. येथील शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही, आम्ही पुन्हा येऊ, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. 

भाजप नेतेही आमच्यासोबत, आता किसान मुक्ती अभियान: राकेश टिकैत

कायदे मागे घेतल्याशिवाय माघार नाही

केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलक शेतकरी माघार घेऊन घरी जाणार नाहीत. सध्या सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त आहे. कापणीचा काळ असल्याने शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी घरी परतत आहेत. सरकार दिल्लीत परत आले की, शेतकरीही परत येतील, असे टिकैत यांनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आंदोलन सुरूच राहील, असे टिकैत यांनी स्पष्ट केले. 

सरकारने चर्चेसाठी निमंत्रित करावे

केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकरी नेते, प्रतिनिधींना चर्चेसाठी निमंत्रित केले पाहिजे. २२ जानेवारी रोजी ज्या स्थितीत चर्चा होती. ती पुन्हा तिथूनच सुरू झाली पाहिजे. कृषी कायदे मागे घ्यावेत. तसेच एमएसपीवर कायदा करावा, अशा मागण्यांवर शेतकरी अजूनही ठाम आहेत, असे टिकैत यांनी नमूद केले आहे. लॉकडाऊन लागला, तरी शेतकरी आपल्या जागेवरून हलणार नाहीत. कृषी कायदे मागे घेत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहणार आहे. देशात आपात्कालिन कर्फ्यू लावण्यात आला किंवा कोणतीही आपात्कालिन परिस्थिती उद्भवली तरी शेतकरी मागे हटणार नाहीत, असा इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला.

भाजपचा विजय आता ममता दीदींनाही दिसतोय; कुचबिहार हिंसेवरून मोदींची टीका

दरम्यान, यूपी गेट परिसरात शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आताच्या घडीला येथे लावण्यात आलेले बहुतांश टेंट रिकामे झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी फ्लायओव्हरखाली, दिल्ली-मेरठ हायवेवर अनेक ठिकाणी टेंट लावले होते. या परिसरात २५ मोठे, ७० मध्यम आणि १०० छोटे टेंट लावण्यात आले होते. १७ ठिकाणी लंगर चालू होते. सध्या येथे ३०० ते ४०० आंदोलनकर्ते शेतकरी राहिले आहेत. त्यातील १००  शेतकरी आसपासच्या गावातील आहेत. जे आंदोलनस्थळी येऊन-जाऊन असतात.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या