शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: आम्ही पुन्हा येऊ! शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही: राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 13:12 IST

Farmers Protest: शेतकरी आता आपापल्या गावी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देराकेश टिकैत यांचा पुन्हा एकदा केंद्राला थेट इशाराशेतकरी आंदोलन सुरूच राहणार - टिकैतआम्ही चर्चेसाठी तयार, सरकारने निमंत्रण द्यावे - टिकैत

नवी दिल्ली: गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) दिल्लीतील विविध सीमांवर सुरू आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दिल्लीतील गंभीर परिस्थिती यांमुळे आंदोलक शेतकरी आता आपापल्या गावी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही पुन्हा येणार आहोत. शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही, असा निर्धात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. (rakesh tikait says this is not shaheen bagh farmers protest continue and crowd will come again)

राजधानी दिल्ली आणि परिसरात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या ४ महिन्यापासून आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांनीही काढता पाय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा दावा राकेश टिकैत यांनी केला असला तरी, सीमेवर आंदोलनस्थळी परिस्थिती मात्र वेगळीच आहे. यूपी गेट परिसरात हजारोंच्या संख्येने काही महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनास बसले होते. मात्र सध्याची परिस्थिती बदलली आहे. येथील शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही, आम्ही पुन्हा येऊ, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. 

भाजप नेतेही आमच्यासोबत, आता किसान मुक्ती अभियान: राकेश टिकैत

कायदे मागे घेतल्याशिवाय माघार नाही

केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलक शेतकरी माघार घेऊन घरी जाणार नाहीत. सध्या सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त आहे. कापणीचा काळ असल्याने शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी घरी परतत आहेत. सरकार दिल्लीत परत आले की, शेतकरीही परत येतील, असे टिकैत यांनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आंदोलन सुरूच राहील, असे टिकैत यांनी स्पष्ट केले. 

सरकारने चर्चेसाठी निमंत्रित करावे

केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकरी नेते, प्रतिनिधींना चर्चेसाठी निमंत्रित केले पाहिजे. २२ जानेवारी रोजी ज्या स्थितीत चर्चा होती. ती पुन्हा तिथूनच सुरू झाली पाहिजे. कृषी कायदे मागे घ्यावेत. तसेच एमएसपीवर कायदा करावा, अशा मागण्यांवर शेतकरी अजूनही ठाम आहेत, असे टिकैत यांनी नमूद केले आहे. लॉकडाऊन लागला, तरी शेतकरी आपल्या जागेवरून हलणार नाहीत. कृषी कायदे मागे घेत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहणार आहे. देशात आपात्कालिन कर्फ्यू लावण्यात आला किंवा कोणतीही आपात्कालिन परिस्थिती उद्भवली तरी शेतकरी मागे हटणार नाहीत, असा इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला.

भाजपचा विजय आता ममता दीदींनाही दिसतोय; कुचबिहार हिंसेवरून मोदींची टीका

दरम्यान, यूपी गेट परिसरात शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आताच्या घडीला येथे लावण्यात आलेले बहुतांश टेंट रिकामे झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी फ्लायओव्हरखाली, दिल्ली-मेरठ हायवेवर अनेक ठिकाणी टेंट लावले होते. या परिसरात २५ मोठे, ७० मध्यम आणि १०० छोटे टेंट लावण्यात आले होते. १७ ठिकाणी लंगर चालू होते. सध्या येथे ३०० ते ४०० आंदोलनकर्ते शेतकरी राहिले आहेत. त्यातील १००  शेतकरी आसपासच्या गावातील आहेत. जे आंदोलनस्थळी येऊन-जाऊन असतात.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या