शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: आम्ही पुन्हा येऊ! शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही: राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 13:12 IST

Farmers Protest: शेतकरी आता आपापल्या गावी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देराकेश टिकैत यांचा पुन्हा एकदा केंद्राला थेट इशाराशेतकरी आंदोलन सुरूच राहणार - टिकैतआम्ही चर्चेसाठी तयार, सरकारने निमंत्रण द्यावे - टिकैत

नवी दिल्ली: गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) दिल्लीतील विविध सीमांवर सुरू आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दिल्लीतील गंभीर परिस्थिती यांमुळे आंदोलक शेतकरी आता आपापल्या गावी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही पुन्हा येणार आहोत. शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही, असा निर्धात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. (rakesh tikait says this is not shaheen bagh farmers protest continue and crowd will come again)

राजधानी दिल्ली आणि परिसरात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या ४ महिन्यापासून आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांनीही काढता पाय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा दावा राकेश टिकैत यांनी केला असला तरी, सीमेवर आंदोलनस्थळी परिस्थिती मात्र वेगळीच आहे. यूपी गेट परिसरात हजारोंच्या संख्येने काही महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनास बसले होते. मात्र सध्याची परिस्थिती बदलली आहे. येथील शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही, आम्ही पुन्हा येऊ, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. 

भाजप नेतेही आमच्यासोबत, आता किसान मुक्ती अभियान: राकेश टिकैत

कायदे मागे घेतल्याशिवाय माघार नाही

केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलक शेतकरी माघार घेऊन घरी जाणार नाहीत. सध्या सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त आहे. कापणीचा काळ असल्याने शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी घरी परतत आहेत. सरकार दिल्लीत परत आले की, शेतकरीही परत येतील, असे टिकैत यांनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आंदोलन सुरूच राहील, असे टिकैत यांनी स्पष्ट केले. 

सरकारने चर्चेसाठी निमंत्रित करावे

केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकरी नेते, प्रतिनिधींना चर्चेसाठी निमंत्रित केले पाहिजे. २२ जानेवारी रोजी ज्या स्थितीत चर्चा होती. ती पुन्हा तिथूनच सुरू झाली पाहिजे. कृषी कायदे मागे घ्यावेत. तसेच एमएसपीवर कायदा करावा, अशा मागण्यांवर शेतकरी अजूनही ठाम आहेत, असे टिकैत यांनी नमूद केले आहे. लॉकडाऊन लागला, तरी शेतकरी आपल्या जागेवरून हलणार नाहीत. कृषी कायदे मागे घेत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहणार आहे. देशात आपात्कालिन कर्फ्यू लावण्यात आला किंवा कोणतीही आपात्कालिन परिस्थिती उद्भवली तरी शेतकरी मागे हटणार नाहीत, असा इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला.

भाजपचा विजय आता ममता दीदींनाही दिसतोय; कुचबिहार हिंसेवरून मोदींची टीका

दरम्यान, यूपी गेट परिसरात शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आताच्या घडीला येथे लावण्यात आलेले बहुतांश टेंट रिकामे झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी फ्लायओव्हरखाली, दिल्ली-मेरठ हायवेवर अनेक ठिकाणी टेंट लावले होते. या परिसरात २५ मोठे, ७० मध्यम आणि १०० छोटे टेंट लावण्यात आले होते. १७ ठिकाणी लंगर चालू होते. सध्या येथे ३०० ते ४०० आंदोलनकर्ते शेतकरी राहिले आहेत. त्यातील १००  शेतकरी आसपासच्या गावातील आहेत. जे आंदोलनस्थळी येऊन-जाऊन असतात.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या