शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 20:52 IST

"टीमला शांततापूर्वक सर्वेक्षण करू द्यायला हवे..."

शेतकरी नेते राकेश टिकैत रविवारी भारतीय किसान यूनियनच्या कार्यकर्ता बैठकीसाठी बदायूंमधील सहसवान येथे आले होते. येथे भारतीय किसान यूनियनच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत कले. यावेळी टिकैत यांनी पत्रकांशी बोलताना उत्तर प्रदेशातील संभल येथील घटना आणि डीएपी खताच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली.

यावेळी पत्रकारांनी राकेश टिकैत यांना संभलमधील जामा मशिदीच्या सर्वेक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या गदारोळासंदर्भात प्रश्न केला. यावर ते म्हणाले, टीमला शांततापूर्वक सर्वेक्षण करू द्यायला हवे. आमचे म्हणणे आहे की, सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल, त्याला देऊन टाका.

संपूर्ण राज्यात डीएपी खताची समस्या - डीएपी खताच्या मुद्द्यावर बोलताना टिकैत म्हणाले, "केवळ जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण राज्यातच डीएपी खताची समस्या दिसून येत आहेत. दर वर्षी, जेव्हा जेव्हा गव्हाच्या पेरणीला सुरुवात होते, तेव्हा तेव्हा शेतकर्यांना डीएपी खताच्या समस्येला सामोरे जावे लागतले. यासाठी, किसान युनियन काय करणार? असे विचारले असता, "डीएपी सरकार, अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या पोटात आहे. डीएपी व्यापाऱ्यांच्या दुकानात सापडेल.  जे ब्लॅकमध्ये विकताना आढळतील त्यांना पकडा.

आपल्याला हळूहळू सेंद्रिय शेतीकडे वळावे लागेल -टिकैत पुढे म्हणाले, "डीएपीच्या या आजारापासून दूर रहायला हवे. 40 वर्षांपूर्वी डीएपी होते का? आपल्या पूर्वजांनी डीएपी शिवाय शेती केली. येणाऱ्या काळात ही समस्या आणखी वाढणार आहे. आपल्याला हळूहळू सेंद्रिय शेतीकडे वळावे लागेल. यावर हा एकमेव उपाय आहे."

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतMosqueमशिदUttar Pradeshउत्तर प्रदेशFarmerशेतकरी