शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Lakhimpur Kheri Violence: “गुंडांना मंत्रिपद दिल्यावर देशाची हीच अवस्था होणार”; BJP वर राकेश टिकैत यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 09:26 IST

शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी लखीमपूर प्रकरणावरून भाजप आणि योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी या प्रकरणावरून भाजप आणि योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मंत्रिपदावर बसवल्यानंतर देशाची हीच अवस्था होणार, अशी बोचरी टीका टिकैत यांनी केली आहे. (rakesh tikait criticised bjp up minister ajay mishra teni over lakhimpur kheri violence)

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा मोनू मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून, काही आंदोलक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संबंधित परिसरात सरकारविरोधातील रोष वाढला आहे. या प्रकरणानंतर आता देशभर संतापाची लाट उसळताना पाहायला मिळत आहे. यानंतर राकेश टिकैत यांनी भाजपवर टीका केली आहे. 

गुंडांना मंत्रिपद दिल्यावर देशाची हीच अवस्था होणार

राकेश टिकैत यांना योगी आदित्यनाथ सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्याकडे काय मागणी केली, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, ज्यांची गुंडगिरीची पार्श्वभूमी आहे, त्यांचे चरित्रही पाहायला हवे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांना गृहमंत्री केल्यावर देशाची अवस्था हीच आणि अशीच होणार, अशी बोचरी टीका राकेश टिकैत यांनी केली. तसेच यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यावर राकेश टिकैत म्हणाले की, हा दावा खोटा आहे. त्यात भाजप कार्यकर्ते मुळीच नव्हते. ते वाहनाने चिरडायला गेले होते. मात्र, वाहन उलटले. काही झाले तरी असे व्हायला नको होते. हे चुकीचे घडले, अशी खंत राकेश टिकैत यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, लखीमपूर खिरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना ४५ लाख आणि जखमींना १० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल, अशी माहिती एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी दिली. एवढेच नाही, तर सीआरपीसीचे कलम १४४ लागू असल्याने राजकीय पक्षांच्या नेत्यांना जिल्हा दौऱ्याची परवानगी देण्यात आली नाही. मात्र, शेतकरी संघटनांच्या सदस्यांना येथे येण्यास परवानगी आहे, असेही प्रशांत कुमार म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारणBJPभाजपा