शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शहांना गुजरातमध्ये आव्हान देतोय मराठमोठा शिलेदार; काँग्रेससाठी बाजीगर ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 15:06 IST

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची दुसरी जागा संकटात; आमदारांच्या राजीनाम्यांमुळे अडचणींत वाढ

अहमदाबाद: राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के बसू लागले आहेत. आमदारांच्या राजीनाम्यांमुळे राज्यसभेची निवडणूक काँग्रेसला जड जाणार असल्याचं दिसू लागलं आहे. सुरुवातीचं संख्याबळ पाहता काँग्रेसच्या दोन जागा येतील, असं वाटत होतं. मात्र आमदारांच्या राजीनाम्यांनंतर आता काँग्रेसची दुसरी जागा धोक्यात आली आहे. मात्र तरीही दोन्हीही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास काँग्रेस नेते व्यक्त करत आहेत.राज्यसभेची दुसरी जागा निवडून आणण्यासाठी केवळ आणखी एका मताची आवश्यकता असल्याचं काँग्रेसचे गुजरात प्रभारी राजीव सातव यांनी सांगितलं. सातव हिंगोलीचे माजी खासदार आहेत. २०१४ मध्ये ते लाटेत निवडून आले होते. आता मोदी-शहांच्या गुजरातमध्ये पक्षानं त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. 'दुसरी जागा निवडून आणण्यासाठी फक्त एका मताची गरज आहे. आम्ही नंबर गेमवर चर्चा करणार नाही. हा आमच्या रणनीतीचा भाग आहे,' असं सातव यांनी सांगितलं. सातव यांनी २०१७ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीचं उदाहरण दिलं. त्यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल रिंगणात होते. त्यावेळीही काँग्रेसच्या काही आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे काँग्रेसची जागा संकटात सापडली होती. रात्री उशिरापर्यंत राजकीय घडामोडी सुरू होत्या. काँग्रेस, भाजपामधील वकील नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पटेल यांनी विजय मिळवला होता. २०१७ मध्ये घडलेल्या घडामोडींकडे सातव यांनी लक्ष वेधलं. 'आम्ही नुसते बसलेलो नाही. संख्याबळावर काम करत आहोत,' असं सातव म्हणाले.२०१७ मध्ये झालेल्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ७७ जागा जिंकल्या. मात्र आता पक्षाचे ६५ आमदार आहेत. मार्चपासून ८ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्याचा फायदा भाजपाला होणार आहे. पुढील नुकसान टाळण्यासाठी काँग्रेसनं आमदारांना अंबाजी, बडोदा आणि राजकोटला पाठवलं आहे. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ३७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. काँग्रेसकडे सध्या ६५ आमदार असल्यानं काँग्रेसची दुसरी जागा निवडून येणं अवघड आहे. काँग्रेसकडून शक्तीसिंह गोहिल आणि भरत सिंह सोळंकी मैदानात आहेत. यातही गोहिल पहिली जागा लढवत आहेत. त्यामुळे सोळंकी यांचा विजय कठीण मानला जात आहे. भाजपानं नरहरी अमीन यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरवल्यानं सोळंकी यांच्यासमोर आव्हान आहे. गुजरातमधील राज्यसभेच्या चार जागा रिक्त होत असून यातील तीन जागा भाजपाकडे, तर एक जागा काँग्रेसकडे आहे. राज्यसभेच्या चार जागांसाठी भाजपानं तीन, तर काँग्रेसनं दोन उमेदवार दिले आहेत. विधानसभेत भाजपाचे १०३ आमदार आहेत. त्यामुळे सुरुवातीला त्यांची तिसरी जागा धोक्यात होती. मात्र काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यांमुळे काँग्रेसचीच दुसरी जागा संकटात आली आहे. याचा फायदा भाजपाला मिळू शकतो.'ते' २९ IPS अधिकारी कामचुकार?; डीजीपींच्या लेटरबॉम्बनं पोलीस खात्यात खळबळ

अरविंद केजरीवालांची तब्येत बिघडली; स्वत:ला केलं आयसोलेट, कोरोना टेस्ट होणारबापरे! अवघ्या ५ दिवसांत ५००००; कोरोना रुग्णांचा वेग धडकी भरवणारमहाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईकरांसाठी 'ही' माहिती सुखावणारी

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाRajeev Satavराजीव सातवRajya Sabhaराज्यसभा