शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"ड्रग्ज आयुष्यातील वेदना कमी करतात; दारू, तंबाखूप्रमाणे कर भरुन वापरायला परवानगी द्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 16:21 IST

Congress KTS Tulsi : ड्रग्ज हे जीवनावश्यक असून त्यामुळे जीवनातील वेदना कमी होतात, त्याचा समतोल वापर केला पाहिजे असं खासदार केटीएस तुलसी यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - आर्यन खानच्या अटकेनंतर देशभरात ड्रग्ज प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. याच दरम्यान देशातील ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार केटीएस तुलसी (Congress KTS Tulsi) यांनी ड्रग्जवर अजब विधान केलं आहे. ड्रग्ज जीवनावश्यक असल्याचं म्हटलं आहे. ड्रग्जनाही गुटखा-दारू, सिगारेट यांच्यासारखी सूट देण्यात यावी. ड्रग्ज हे जीवनावश्यक असून त्यामुळे जीवनातील वेदना कमी होतात, त्याचा समतोल वापर केला पाहिजे असं खासदार केटीएस तुलसी यांनी म्हटलं आहे. 

केटीएस तुलसी यांनी ड्रग्जमुळे आयुष्यातील वेदना कमी होतात हे सांगताना "दारू, गुटखा, तंबाखूमुळेही हानी होते. मात्र यांच्यावर कर भरून त्याचे सेवन करू दिले जाते. मग ड्रग्ज का नाही? करवसुली झाल्यानंतर ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे" असं म्हटलं आहे. "अनेक प्रसंगी ड्रग्जच्या माध्यमातून औषधे घ्यावी लागतात, त्यामुळे ड्रग्जच्या वापरास परवानगी का देऊ नये? एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस) कायदा, 1985 मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे कारण त्याचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो" असं देखील म्हटलं आहे. 

एनडीपीएस कायद्याचा वारंवार गैरवापर लोकांना अंमली पदार्थांच्या जास्त किंवा कमी वापराबाबत त्रास देण्यासाठी केला जातो. एनडीपीएस कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे अस केटीएस तुलसी य़ांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार केटीएस तुलसी हे देशातील कायदेतज्ज्ञ खासदार मानले जातात. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यादरम्यान तुलसी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बराच वेळ संवाद झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Indiaभारतcongressकाँग्रेस