शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी जम्मू-काश्मीर आणि लडाखची विभागणी हितकारक: राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 15:23 IST

कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. इतिहास साक्षीदार आहे की, भारताने कधीही कुणावरही प्रथम वार केला नाही, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केले.

लडाख: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी भारतीय सैन्याचे अधिकारी आणि जवानांशी मनमोकळा संवाद साधला. भारताची संरक्षण यंत्रणा मजबूत आहे. त्यामुळे कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. इतिहास साक्षीदार आहे की, भारताने कधीही कुणावरही प्रथम वार केला नाही, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केले. (rajnath singh says no one can show india an eye)

लडाख दौऱ्यावर असलेल्या राजनाथ सिंह यांनी काही योजना, प्रकल्पांचे लोकार्पण केले. तसेच जम्मू-काश्मीरच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच लडाखच्या नेत्यांशीही संवाद साधणार आहेत. विविध विषयांवर चर्चा करणार असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. लडाख येथील पायाभूत सुविधांमध्ये मोठे तसेच ठोस बदल करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात असल्याचेही सिंह यांनी सांगितले. तसेच कारु मिलिस्ट्री स्टेशन येथे जाऊन जवानांना प्रोत्साहन दिले. 

“भारतीयांची युरोपीयन देशांमध्ये जाण्याची अडचण दूर होईल, मी सर्वांना हमी देतो”: अदर पुनावाला

राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी विभागणी हितकारक

तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी एक ट्विट केले असून, जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेला मोठा हातभार लागला आहे. यानंतर मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवाया कमी झाल्या आहेत. तसेच दोन्ही प्रदेशांमधील नागरिकांसाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विकास करण्याच्या अनेक संधी विभागणीनंतर खुल्या झाल्या आहेत, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गेल्या वर्षापासून लडाख सीमेजवळील सुरु असलेल्या चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत भारताने सुमारे ५० हजार अतिरिक्त सैनिक सीमेवर तैनात केल्याची माहिती मिळाली आहे. चीनच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी आता सुमारे २ लाख सैनिक तैनात करण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या ४० टक्के अधिक असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाखRajnath Singhराजनाथ सिंहCentral Governmentकेंद्र सरकार