शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींपेक्षा शेतीची जास्त माहिती : राजनाथ सिंहांचे टीकेला थेट प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 11:30 IST

शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, आम्ही शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देराहुल गांधीच्या टीकेचा राजनाथ सिंहांकडून समाचारराहुल यांच्यापेक्षा शेतीची जास्त माहिती - राजनाथ सिंहशेतकरी अन्नदाते, नुकसान होऊ देणार नाही - राजनाथ सिंह

नवी दिल्ली :राहुल गांधी माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत. त्यांच्यापेक्षा मला शेतीबद्दल जास्त माहिती आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलता दाखवण्याचे कारण नाही. शेतकरी आंदोलनामुळे केवळ मी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील दुःखी आहेत, असे त्यांनी नमूद केले. नवीन शेतकरी कायद्यासंदर्भात देशातील काही घटक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला आहे. केवळ हो किंवा नाही, अशा पद्धतीने चर्चा होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी विस्तृत आणि सविस्तर चर्चा केली पाहिजे, अशी मी विनंती करतो. लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले. 

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी आणि नक्षलवादी असल्याचा तथाकथित आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यावर जोरदार पलटवार करत राजनाथ सिंह म्हणाले की, अशा प्रकारचा आरोप करणे चुकीचे आहे. आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतो. ते अन्नदाते आहेत. मी एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतला आहे. शेतीसंदर्भात राहुल गांधींपेक्षा मला जास्त माहिती आहे. आम्ही शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर अन्य देशातील पंतप्रधानांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांपासून त्यांनी दूर राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद टीका करणे योग्य नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीवर खालच्या पातळीवर टीका करणे अशोभनीय असून, ही खेदजनक बाब आहे, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केले. 

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपRajnath Singhराजनाथ सिंहRahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरीagitationआंदोलनdelhiदिल्ली