शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

राहुल गांधींपेक्षा शेतीची जास्त माहिती : राजनाथ सिंहांचे टीकेला थेट प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 11:30 IST

शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, आम्ही शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देराहुल गांधीच्या टीकेचा राजनाथ सिंहांकडून समाचारराहुल यांच्यापेक्षा शेतीची जास्त माहिती - राजनाथ सिंहशेतकरी अन्नदाते, नुकसान होऊ देणार नाही - राजनाथ सिंह

नवी दिल्ली :राहुल गांधी माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत. त्यांच्यापेक्षा मला शेतीबद्दल जास्त माहिती आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलता दाखवण्याचे कारण नाही. शेतकरी आंदोलनामुळे केवळ मी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील दुःखी आहेत, असे त्यांनी नमूद केले. नवीन शेतकरी कायद्यासंदर्भात देशातील काही घटक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला आहे. केवळ हो किंवा नाही, अशा पद्धतीने चर्चा होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी विस्तृत आणि सविस्तर चर्चा केली पाहिजे, अशी मी विनंती करतो. लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले. 

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी आणि नक्षलवादी असल्याचा तथाकथित आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यावर जोरदार पलटवार करत राजनाथ सिंह म्हणाले की, अशा प्रकारचा आरोप करणे चुकीचे आहे. आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतो. ते अन्नदाते आहेत. मी एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतला आहे. शेतीसंदर्भात राहुल गांधींपेक्षा मला जास्त माहिती आहे. आम्ही शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर अन्य देशातील पंतप्रधानांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांपासून त्यांनी दूर राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद टीका करणे योग्य नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीवर खालच्या पातळीवर टीका करणे अशोभनीय असून, ही खेदजनक बाब आहे, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केले. 

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपRajnath Singhराजनाथ सिंहRahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरीagitationआंदोलनdelhiदिल्ली