शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींपेक्षा शेतीची जास्त माहिती : राजनाथ सिंहांचे टीकेला थेट प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 11:30 IST

शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, आम्ही शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देराहुल गांधीच्या टीकेचा राजनाथ सिंहांकडून समाचारराहुल यांच्यापेक्षा शेतीची जास्त माहिती - राजनाथ सिंहशेतकरी अन्नदाते, नुकसान होऊ देणार नाही - राजनाथ सिंह

नवी दिल्ली :राहुल गांधी माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत. त्यांच्यापेक्षा मला शेतीबद्दल जास्त माहिती आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलता दाखवण्याचे कारण नाही. शेतकरी आंदोलनामुळे केवळ मी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील दुःखी आहेत, असे त्यांनी नमूद केले. नवीन शेतकरी कायद्यासंदर्भात देशातील काही घटक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला आहे. केवळ हो किंवा नाही, अशा पद्धतीने चर्चा होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी विस्तृत आणि सविस्तर चर्चा केली पाहिजे, अशी मी विनंती करतो. लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले. 

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी आणि नक्षलवादी असल्याचा तथाकथित आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यावर जोरदार पलटवार करत राजनाथ सिंह म्हणाले की, अशा प्रकारचा आरोप करणे चुकीचे आहे. आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतो. ते अन्नदाते आहेत. मी एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतला आहे. शेतीसंदर्भात राहुल गांधींपेक्षा मला जास्त माहिती आहे. आम्ही शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर अन्य देशातील पंतप्रधानांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांपासून त्यांनी दूर राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद टीका करणे योग्य नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीवर खालच्या पातळीवर टीका करणे अशोभनीय असून, ही खेदजनक बाब आहे, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केले. 

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपRajnath Singhराजनाथ सिंहRahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरीagitationआंदोलनdelhiदिल्ली