शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदार फुटण्याची भीती; उदयपूरला पोहचण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 12:11 IST

काँग्रेसनं राज्यसभेसाठी मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना मैदानात उतरवलं आहे.

जयपूर - राजस्थानमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता विजयासाठी रणनीती आखण्याची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसनं या निवडणुकीसाठी खूप सतर्कता बाळगली आहे. आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी उदयपूरच्या एका हॉटेलमध्ये शिफ्ट केले. राज्यसभा निवडणुकीसाठी घोडेबाजार होण्याची भीती काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांना एकत्रित ठेवण्याचा प्लॅन नेत्यांनी बनवला आहे. येत्या १० जूनला राज्यसभा निवडणूक होणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या सर्व आमदारांना हायकमांडनं उदयपूरला पोहचण्याचे आदेश दिलेत. काही आमदार बुधवारीच उदयपूरमध्ये दाखल झाले. तर काही आज होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदारांसोबत, अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षाचे आमदारही जे काँग्रेसला समर्थन करणार आहेत. त्यांनाही उदयपूरच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली. विशेष म्हणजे राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उद्योगपती सुभाष चंद्रा यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षात खळबळ माजली. सुभाष चंद्रा यांना भाजपा आणि आरएलपी यांनी आधीच समर्थन दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण काँग्रेस समर्थक आमदार फुटण्याची भीती काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.

काँग्रेसनं राज्यसभेसाठी मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना मैदानात उतरवलं आहे. तर भाजपाने माजी मंत्री घनश्याम तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. अपक्ष म्हणून सुभाष चंद्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रा हे सध्या हरियाणाच्या कोट्यातून खासदार आहेत. १ ऑगस्ट रोजी त्यांचा कार्यकाळ संपत आहे. 

काय आहे मतांचे गणित?राज्य विधानसभेत १०८ आमदारांसह सत्ताधारी काँग्रेस ४ पैकी २ जागांवर विजय मिळवू शकते. तर भाजपा १ जागेवर सहज विजयी होईल. या ४ जागांमध्ये एका जागेवर सुभाष चंद्रा यांनी दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसची १ जागा अडचणीत आली आहे. काँग्रेसला सुरुवातीला ४१-४१-४१ फॉर्म्युल्याने विजय मिळेल असं वाटत होते परंतु तिसऱ्या जागेसाठी काँग्रेसकडे स्वत:कडे २६ मते आहेत. तिसऱ्या जागेसाठी १५ मतांची पक्षाला आवश्यकता आहे. भाजपाकडे ७१ मते आहेत. त्यांच्याकडे १ जागा जिंकल्यानंतर जास्तीची ३० मते राहतील. त्यामुळे चौथ्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. विधानसभेत १३ अपक्ष आमदार आहेत. इतर पक्षाचे ८ आमदार आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणात ही मते कुणाला मिळतात यावर चौथ्या उमेदवाराचं भवितव्य टिकून आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाRajasthanराजस्थानBJPभाजपा