शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदार फुटण्याची भीती; उदयपूरला पोहचण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 12:11 IST

काँग्रेसनं राज्यसभेसाठी मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना मैदानात उतरवलं आहे.

जयपूर - राजस्थानमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता विजयासाठी रणनीती आखण्याची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसनं या निवडणुकीसाठी खूप सतर्कता बाळगली आहे. आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी उदयपूरच्या एका हॉटेलमध्ये शिफ्ट केले. राज्यसभा निवडणुकीसाठी घोडेबाजार होण्याची भीती काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांना एकत्रित ठेवण्याचा प्लॅन नेत्यांनी बनवला आहे. येत्या १० जूनला राज्यसभा निवडणूक होणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या सर्व आमदारांना हायकमांडनं उदयपूरला पोहचण्याचे आदेश दिलेत. काही आमदार बुधवारीच उदयपूरमध्ये दाखल झाले. तर काही आज होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदारांसोबत, अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षाचे आमदारही जे काँग्रेसला समर्थन करणार आहेत. त्यांनाही उदयपूरच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली. विशेष म्हणजे राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उद्योगपती सुभाष चंद्रा यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षात खळबळ माजली. सुभाष चंद्रा यांना भाजपा आणि आरएलपी यांनी आधीच समर्थन दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण काँग्रेस समर्थक आमदार फुटण्याची भीती काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.

काँग्रेसनं राज्यसभेसाठी मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना मैदानात उतरवलं आहे. तर भाजपाने माजी मंत्री घनश्याम तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. अपक्ष म्हणून सुभाष चंद्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रा हे सध्या हरियाणाच्या कोट्यातून खासदार आहेत. १ ऑगस्ट रोजी त्यांचा कार्यकाळ संपत आहे. 

काय आहे मतांचे गणित?राज्य विधानसभेत १०८ आमदारांसह सत्ताधारी काँग्रेस ४ पैकी २ जागांवर विजय मिळवू शकते. तर भाजपा १ जागेवर सहज विजयी होईल. या ४ जागांमध्ये एका जागेवर सुभाष चंद्रा यांनी दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसची १ जागा अडचणीत आली आहे. काँग्रेसला सुरुवातीला ४१-४१-४१ फॉर्म्युल्याने विजय मिळेल असं वाटत होते परंतु तिसऱ्या जागेसाठी काँग्रेसकडे स्वत:कडे २६ मते आहेत. तिसऱ्या जागेसाठी १५ मतांची पक्षाला आवश्यकता आहे. भाजपाकडे ७१ मते आहेत. त्यांच्याकडे १ जागा जिंकल्यानंतर जास्तीची ३० मते राहतील. त्यामुळे चौथ्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. विधानसभेत १३ अपक्ष आमदार आहेत. इतर पक्षाचे ८ आमदार आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणात ही मते कुणाला मिळतात यावर चौथ्या उमेदवाराचं भवितव्य टिकून आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाRajasthanराजस्थानBJPभाजपा