शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सचिन पायलटांची खेळी फेल? अशोक गेहलोतांचे माध्यमांसमोर शक्तीप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 14:54 IST

यापूर्वी काँग्रेसने पक्षाच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी उपस्थित रहा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा व्हीप जारी केला होता.

ठळक मुद्देया बैठकीसाठी 102  आमदार उपस्थित असल्याचा काँग्रेसचा दावा.पायलट यांच्या समर्थनात गेलेले 24 पैकी जवळपास अर्धे आमदार पुन्हा निसटले.काँग्रेसने पक्षाच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी उपस्थित रहावे, असे व्हिप बजावले आहे.

जयपूर -राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीपूर्वी कॅमेऱ्यासमोर शक्ती प्रदर्शन केले. एवढेच नाही, तर या बैठकीसाठी 102  आमदार उपस्थित असल्याचा दावाही करण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर व्हिक्ट्री साइनदेखील केल्याचे दिसून आले. मात्र, अद्याप बैठकीला सुरवात झालेली नाही. (Rajasthan Political Crisis)

यापूर्वी काँग्रेसने पक्षाच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी उपस्थित रहा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा व्हीप जारी केला होता. यानंतर रणदीप सुरजेवाला यांनी सचिन पायलट यांच्यासह जे नाराज आमदार आहेत त्यांनी बैठकीला यावे आणि आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन केले होते. यावर, व्हिप केवळ विधानसभेसाठीच जारी केले जाऊ शकते. हा व्हिप कायद्याच्या विरोधात आहे, असे पायलट यांच्या गटाने म्हटले होते.

पायलट समर्थक आमदार गेहलोत यांच्या सोबत -सूत्रांनी दलेल्या माहितीनुसार, भाजपासोबत एकमत न झाल्याने काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या समर्थनात गेलेले 24 पैकी जवळपास अर्धे आमदार पुन्हा निसटले आहेत. हे आमदार आज बैठकीत सहभागी होत आहेत. अद्यापही 12 काँग्रेसचे आणि 3 अपक्ष आमदार पायलट यांच्या संपर्कात आहेत. हे आमदार मात्र बैठकीसाठी आले नाही.

महाराष्ट्रातला चेहरा सावरणार राजस्थान काँग्रेसची नाव? -राजस्थानमधील काँग्रेसचं सरकार धोक्यात आहे. याचदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील विश्वासू चेहरा म्हणून ओळख असलेले खासदार राजीव सातव यांनी राजस्थानला रवाना होण्याचे आदेश दिले आहे. राहुल गांधी यांनी राजीव सातव यांना निरोप पाठवला असून, ते आज संध्याकाळीच राजस्थानला रवाना होणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. याआधी देखील राजीव सातव यांनी गुजरातमध्ये पक्षबांधणीत मोठं काम केलं होतं. त्याचंच फळ म्हणून काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

वसुंधरा राजेही अलिप्त -राजस्थानातल्या सत्तासंघर्षावर भाजपाच्या इतर नेत्यांप्रमाणे वसुंधरा राजे कोणताही हस्तक्षेप करताना दिसत नाहीत. यामागे राजकीय गणित असल्याचं राजकीय पंडित सांगतात. गेहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यामध्ये अतिशय उत्तम राजकीय केमिस्ट्री आहे. राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर राजे यांनी त्याविरोधात कोणतीही टीका केलेली नाही. इतकंच नव्हे, तर गेल्या दीड वर्षांत त्या सरकारविरोधात त्या सरकारविरोधात कधीही रस्त्यावर उतरलेल्या नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या -

मैत्रीच्या आडून चिनी राष्ट्रपतींची बेईमानी, ...म्हणून लडाखमध्ये ड्रॅगन सैन्याने केली होती घुसखोरी

CoronaVirus : खूशखबर! कोरोना व्हॅक्‍सीनवर रशियानं मारली 'बाजी'; सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा, सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वी

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटRahul Gandhiराहुल गांधी