शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Rajasthan Political Crisis: काँग्रेसच्या 'त्या' १९ आमदारांनी राजीनामा दिला तर...? जाणून घ्या राजस्थानातलं संख्याबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 15:38 IST

Rajasthan Political Crisis: राजस्थानमध्ये भाजपानं मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करायचा प्रयत्न केल्यास त्यांच्यासमोर मोठं आव्हान

जयपूर: राजस्थानातील सत्ता संघर्ष (Rajasthan Political Crisis) कायम आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसचे बहुसंख्य आमदार उपस्थित राहिले. त्यामुळे उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांचं बंड मोडीत निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण बैठकीला अनुपस्थित राहिलेले काँग्रेसचे किमान १९ आमदार नेमकं काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. गेहलोत आमदारांसोबत माध्यमांसमोर आले. त्यांनी व्हिक्टरीचं चिन्ह दाखवत राज्यातील सरकार टिकणार असल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केलं. मात्र गेहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीला पायलट यांच्यासह काँग्रेसचे किमान १९ आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे राजस्थानातील काँग्रेस सरकारवरील संकट कायम असल्याचं दिसत आहे.आपल्याकडे २५ ते ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा पायलट गटाकडून केला जात होता. मात्र आज दुपारी बोलावण्यात आलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला किमान १९ आमदार अनुपस्थित होते. मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानात काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यास विधानसभेतील आमदारसंख्या २०० वरून १८१ होईल. अशा परिस्थितीत बहुमतासाठी ९१ आमदारांचा पाठिंबा गरजेचा असेल.विधानसभेत भाजपाचे ७२ आमदार आहेत. याशिवाय त्यांना आरएलपीच्या ३ आमदारांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे गेहलोत यांच्याकडे काँग्रेसच्या ८८ (बैठकीला अनुपस्थित असलेल्या सर्व १९ आमदारांनी राजीनामे दिल्यास) आमदारांसह लहान पक्षांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ते सहज सत्ता टिकवू शकतील. काँग्रेसच्या २५ ते ३० आमदारांनी राजीनामे दिल्यास भाजपाला राजस्थानात मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करता येईल. याशिवाय त्यांना लहान पक्षांसह अपक्षांनादेखील हाताशी घ्यावं लागेल."राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार"सचिन पायलटांची खेळी फेल? अशोक गेहलोतांचे माध्यमांसमोर शक्तीप्रदर्शनभाजपाच्या महाराणी वाचवणार काँग्रेस सरकार?; 'सायलेंट मोड'मुळे जादूगार गेहलोत निश्चिंत

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलट