शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

कुटुंबातील 8 जणांना 4 वर्षीय चिमुकल्याने दिला मुखाग्नी; गावावर शोककळा, नेमकं काय झालं..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 15:40 IST

एकीकडे नववर्षाचे जल्लोषात स्वागत सुरू होते, तर दुसरीकडे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका कुटुंबावर काळाने घाला घातला.

एकीकडे राजस्थानमधील लोक नववर्षाचे जल्लोषात स्वागत करत होते, तर दुसरीकडे याच राजस्थानमध्ये नवर्षाच्या पहिल्याच दिवशी एका कुटुंबावर काळाने घाला घातला. एका भीषण रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, यातील 9 जण एकाच गावातील, तर 8 जण एकाच कुटुंबातील होते. जयपूरच्या सामोदमधील 9 जण नववर्षाच्या पहिल्या दिवशी कुलदेवीचे दर्शन घेऊन परतत होते. यावेळी झालेल्या भीषण अपघातात 2 सख्ख्या भावांसह पत्नी आणि मुलांचा मृत्यू झाला. 

एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यूकैलाशचंद आणि सुवालाल यांचे कुटुंब 1 जानेवारी रोजी कुलदेवी मातेचे दर्शन घेऊन त्यांच्या नवीन वाहनाने घरी परतत असताना खंडेला-पलसाणा रस्त्यावर त्यांच्या आधी दुचाकीला आणि नंतर ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात ज्या 12 लोकांचा मृत्यू झाला, यातील 9 जण एकाच गावातील होते. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे, यातील एकाच कुटुंबातील 8 जणांचा तिरडी एकाचवेळी उठली. घरातील चार वर्षीय चिमुकल्याने या आठ जणांना एकाच वेळी मुखाग्नी दिला. हे दृष्य पाहून तिथे उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.

एकाच चितेवर 8 मृतदेह या अपघातात कैलाशचंद यांची दोन मुले विजय व अजय यांच्यासह मुलगी रेखा, विजयची पत्नी राधा, सुवालाल यांच्या दोन सूना पूनम व अनुराधा, नातू आरव व नात निक्कू, शेजारी अरविंद यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर सोमवारी सर्व मृतदेह एकत्र गावात आल्यावर गावात एकच खळबळ उडाली.  घराच्या अंगणात ठेवलेले मृतदेह पाहून गावात नीरव शांतता पसरली. यावेळी 8 तिरड्या एकत्र उचलल्या आणि सर्वांना एकाच चितेवर जाळण्यात आले. अंत्ययात्रेत गावातील शेकडो लोक सामील झाले होते. यावेळी प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द होता... हे राम! 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAccidentअपघातDeathमृत्यू