शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कुटुंबातील 8 जणांना 4 वर्षीय चिमुकल्याने दिला मुखाग्नी; गावावर शोककळा, नेमकं काय झालं..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 15:40 IST

एकीकडे नववर्षाचे जल्लोषात स्वागत सुरू होते, तर दुसरीकडे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका कुटुंबावर काळाने घाला घातला.

एकीकडे राजस्थानमधील लोक नववर्षाचे जल्लोषात स्वागत करत होते, तर दुसरीकडे याच राजस्थानमध्ये नवर्षाच्या पहिल्याच दिवशी एका कुटुंबावर काळाने घाला घातला. एका भीषण रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, यातील 9 जण एकाच गावातील, तर 8 जण एकाच कुटुंबातील होते. जयपूरच्या सामोदमधील 9 जण नववर्षाच्या पहिल्या दिवशी कुलदेवीचे दर्शन घेऊन परतत होते. यावेळी झालेल्या भीषण अपघातात 2 सख्ख्या भावांसह पत्नी आणि मुलांचा मृत्यू झाला. 

एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यूकैलाशचंद आणि सुवालाल यांचे कुटुंब 1 जानेवारी रोजी कुलदेवी मातेचे दर्शन घेऊन त्यांच्या नवीन वाहनाने घरी परतत असताना खंडेला-पलसाणा रस्त्यावर त्यांच्या आधी दुचाकीला आणि नंतर ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात ज्या 12 लोकांचा मृत्यू झाला, यातील 9 जण एकाच गावातील होते. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे, यातील एकाच कुटुंबातील 8 जणांचा तिरडी एकाचवेळी उठली. घरातील चार वर्षीय चिमुकल्याने या आठ जणांना एकाच वेळी मुखाग्नी दिला. हे दृष्य पाहून तिथे उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.

एकाच चितेवर 8 मृतदेह या अपघातात कैलाशचंद यांची दोन मुले विजय व अजय यांच्यासह मुलगी रेखा, विजयची पत्नी राधा, सुवालाल यांच्या दोन सूना पूनम व अनुराधा, नातू आरव व नात निक्कू, शेजारी अरविंद यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर सोमवारी सर्व मृतदेह एकत्र गावात आल्यावर गावात एकच खळबळ उडाली.  घराच्या अंगणात ठेवलेले मृतदेह पाहून गावात नीरव शांतता पसरली. यावेळी 8 तिरड्या एकत्र उचलल्या आणि सर्वांना एकाच चितेवर जाळण्यात आले. अंत्ययात्रेत गावातील शेकडो लोक सामील झाले होते. यावेळी प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द होता... हे राम! 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAccidentअपघातDeathमृत्यू