शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१.५१ कोटी रोख, ३० तोळे सोने, ५ किलो चांदी अन्... लग्नातल्या भेटवस्तू पाहून पाहुणे थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 18:23 IST

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील एक लग्न चर्चेत आलं आहे कारण यामध्ये मामांनी भाचीला तब्बल ३ कोटींच्या भेटवस्तू दिल्या आहेत.

Rajasthan Mayra: राजस्थानमधील नागौर जिल्हा लग्नातील एका प्रथेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागौरमध्ये बहिणीच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी मायरा भरण्याची एक परंपरा आहे. ज्यामध्ये मुलाच्या किंवा मुलीच्या कुटुंबाला मामाचे कुटुंब लग्नात आर्थिक मदत करतात. पण, यावेळी तीन भावांनी मिळून ३ कोटी रुपये दिले आहेत, जे लग्नाच्या संपूर्ण खर्चापेक्षा कितीतरी जास्त आहे. नागौरमध्ये तीन भावांनी त्याच्या पुतण्या आणि भाचीच्या लग्नात १ कोटी ५१ लाख रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन प्लॉट अशा सुमारे ३ कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहे. त्यामुळे याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

नागौर शहरातील हनुमान बाग येथील रहिवासी रामबक्स खोजा यांनी आपल्या पुतण्या आणि भाचीच्या लग्नात मायरा प्रथा पार पाडली. हे लग्न अतिशय भव्यदिव्य होते. या लग्नाला अनेक राजकीय पक्षांच्या पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. लग्नादरम्यान तीन मामांनी एकुलत्या एक भाचीला १ कोटी ५१ लाख रुपये रोख दिले. एका सुटकेसमध्ये हे पैसे आणले होते. त्यानंतर सर्व रोख पैसे काढून सर्व पाहुण्यांसमोर मोजली गेली. एवढेच नाही तर मामाने ३० तोळे सोने आणि ५ किलो चांदीचे दागिने भाचीला भेट म्हणून दिले आहेत.

रामबक्स खोजा यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. दोन मुलं सरकारी शिक्षक असून एक खासगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्या मुलीचा विवाह जयल असेंब्लीच्या फरदौद येथील मदनलाल यांच्याशी झाला आहे. रामबक्स खोजा शेतीचे काम करतात. दोन हजार लोकांसह रामबक्स हे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि पाहुण्यांसह त्यांच्या बहिणीच्या घरी पोहोचले. तिन्ही भावांनी मिळून बहीण बिराजयाला चुनरीने सजवून मायराची सुरुवात केली. एक कोटी ५१ लाख रुपये रोख, ३० तोळे सोने, पाच किलो चांदी आणि नागौर शहरातील दोन प्लॉट बहिणीच्या नावावर केले.

व्हायरल व्हिडीओमध्ये रोख रक्कम भरून तीन लोक मंडपात येत आहेत. लोक उत्सुक नजरेने नोटांच्या बंडलांकडे बघत आहेत. मंडपातील सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत सुटकेसमधून सर्व रोख रक्कम काढून मंडपात आणली जाते. एवढेच नाही तर मामाने दिलेल्या रकमेचीही मोजणी जागेवरच करण्यात आली. 

दरम्यान गेल्या वर्षीही तीन शेतकरी भावांनी त्यांच्या एकुलत्या एक भाचीच्या लग्नावर ३ कोटी २१ लाख रुपये खर्च केले. तिन्ही मामा ताटात रोकड घेऊन आले आणि त्यांनी भाचीला लाखो रुपयांच्या भेटवस्तूही दिल्या ज्यात दागिने, कपडे, धान्य, ट्रॅक्टर-ट्रॉली, स्कूटर आणि इतर वस्तूंचा समावेश होता. लग्नात मुलीचे आजोबा ताटात सुमारे ८१ लाख रुपये घेऊन आले. यावेळी त्यांनी ताट डोक्यावर धरले होते. ताटात ५०० रुपयांचे अनेक बंडल ठेवले होते. याशिवाय १६ एकर जमीन, ३० लाख रुपये किमतीचा भूखंड, ४१ तोळे सोने आणि ३ किलो चांदीचे दागिने देण्यात आले होते. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल