शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

१.५१ कोटी रोख, ३० तोळे सोने, ५ किलो चांदी अन्... लग्नातल्या भेटवस्तू पाहून पाहुणे थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 18:23 IST

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील एक लग्न चर्चेत आलं आहे कारण यामध्ये मामांनी भाचीला तब्बल ३ कोटींच्या भेटवस्तू दिल्या आहेत.

Rajasthan Mayra: राजस्थानमधील नागौर जिल्हा लग्नातील एका प्रथेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागौरमध्ये बहिणीच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी मायरा भरण्याची एक परंपरा आहे. ज्यामध्ये मुलाच्या किंवा मुलीच्या कुटुंबाला मामाचे कुटुंब लग्नात आर्थिक मदत करतात. पण, यावेळी तीन भावांनी मिळून ३ कोटी रुपये दिले आहेत, जे लग्नाच्या संपूर्ण खर्चापेक्षा कितीतरी जास्त आहे. नागौरमध्ये तीन भावांनी त्याच्या पुतण्या आणि भाचीच्या लग्नात १ कोटी ५१ लाख रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन प्लॉट अशा सुमारे ३ कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहे. त्यामुळे याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

नागौर शहरातील हनुमान बाग येथील रहिवासी रामबक्स खोजा यांनी आपल्या पुतण्या आणि भाचीच्या लग्नात मायरा प्रथा पार पाडली. हे लग्न अतिशय भव्यदिव्य होते. या लग्नाला अनेक राजकीय पक्षांच्या पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. लग्नादरम्यान तीन मामांनी एकुलत्या एक भाचीला १ कोटी ५१ लाख रुपये रोख दिले. एका सुटकेसमध्ये हे पैसे आणले होते. त्यानंतर सर्व रोख पैसे काढून सर्व पाहुण्यांसमोर मोजली गेली. एवढेच नाही तर मामाने ३० तोळे सोने आणि ५ किलो चांदीचे दागिने भाचीला भेट म्हणून दिले आहेत.

रामबक्स खोजा यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. दोन मुलं सरकारी शिक्षक असून एक खासगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्या मुलीचा विवाह जयल असेंब्लीच्या फरदौद येथील मदनलाल यांच्याशी झाला आहे. रामबक्स खोजा शेतीचे काम करतात. दोन हजार लोकांसह रामबक्स हे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि पाहुण्यांसह त्यांच्या बहिणीच्या घरी पोहोचले. तिन्ही भावांनी मिळून बहीण बिराजयाला चुनरीने सजवून मायराची सुरुवात केली. एक कोटी ५१ लाख रुपये रोख, ३० तोळे सोने, पाच किलो चांदी आणि नागौर शहरातील दोन प्लॉट बहिणीच्या नावावर केले.

व्हायरल व्हिडीओमध्ये रोख रक्कम भरून तीन लोक मंडपात येत आहेत. लोक उत्सुक नजरेने नोटांच्या बंडलांकडे बघत आहेत. मंडपातील सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत सुटकेसमधून सर्व रोख रक्कम काढून मंडपात आणली जाते. एवढेच नाही तर मामाने दिलेल्या रकमेचीही मोजणी जागेवरच करण्यात आली. 

दरम्यान गेल्या वर्षीही तीन शेतकरी भावांनी त्यांच्या एकुलत्या एक भाचीच्या लग्नावर ३ कोटी २१ लाख रुपये खर्च केले. तिन्ही मामा ताटात रोकड घेऊन आले आणि त्यांनी भाचीला लाखो रुपयांच्या भेटवस्तूही दिल्या ज्यात दागिने, कपडे, धान्य, ट्रॅक्टर-ट्रॉली, स्कूटर आणि इतर वस्तूंचा समावेश होता. लग्नात मुलीचे आजोबा ताटात सुमारे ८१ लाख रुपये घेऊन आले. यावेळी त्यांनी ताट डोक्यावर धरले होते. ताटात ५०० रुपयांचे अनेक बंडल ठेवले होते. याशिवाय १६ एकर जमीन, ३० लाख रुपये किमतीचा भूखंड, ४१ तोळे सोने आणि ३ किलो चांदीचे दागिने देण्यात आले होते. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल