शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाजपाला धक्का; २३ पालिका काँग्रेसच्या 'हाता'त, राजस्थानातून ओसरली 'मोदी लाट'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 16:14 IST

'मोदी तुझ से बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं' असा निर्धार राजस्थानातील जनतेनं विधानसभा निवडणुकीआधी केला होता.

ठळक मुद्देराजस्थानच्या शहरी मतदारांनी 'कमळा'ला नाकारल्याचं समोर आलं आहे.डिसेंबर २०१८ मध्ये जाहीर झालेल्या राजस्थान विधानसभेच्या निकालात भाजपाला सत्ता गमवावी लागली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला ४९ पैकी फक्त सहा ठिकाणी विजय मिळाला आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्यानं भाजपाच्या गोटात अस्वस्थता आणि नाराजी असतानाच, राजस्थानच्या शहरी मतदारांनीही 'कमळा'ला नाकारल्याचं समोर आलं आहे. २ महापालिका, ३० नगरपालिका आणि १७ नगरपरिषदा अशा एकूण ४९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसनं २३ ठिकाणी आपला झेंडा फडकवला आहे, तर भाजपाला फक्त सहा ठिकाणी विजय मिळाला आहे. २० जागांवर अन्य पक्ष आणि अपक्षांनी बाजी मारली आहे. ही कामगिरी पक्षनेतृत्वाच्या चिंता वाढवणारीच मानली जातेय. 

'मोदी तुझ से बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं' असा निर्धार राजस्थानातील जनतेनं विधानसभा निवडणुकीआधी केला होता. त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला. डिसेंबर २०१८ मध्ये जाहीर झालेल्या राजस्थान विधानसभेच्या निकालात भाजपाला सत्ता गमवावी लागली. वसुंधरा राजेंचं राज खालसा झालं आणि काँग्रेसला 'अच्छे दिन' आले. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानातील सर्वच्या सर्व २५ जागांवर 'कमळ' फुललं होतं.

लोकसभेवेळी उसळलेली मोदी लाट राजस्थानातून पुन्हा एकदा ओसरल्याचं चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळालं. भरतपूर आणि बीकानेर महापालिकांमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरला असला, तरी नगरपालिका/नगरपरिषदांमध्ये त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. निवडणुकीआधी या ४९ पैकी २१ ठिकाणी भाजपाची सत्ता होती. ती आता सहावर आली आहे. याउलट, काँग्रेसच्या खात्यात दोन पालिका वाढल्या असून ते २३ वर पोहोचलेत. तब्बल २० ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या हाती सत्तेची किल्ली असणार आहे. 

१६ नोव्हेंबरला या ४९ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झालं होतं. अयोध्या प्रकरणाचा निकाल या ठिकाणी भाजपाला फायदेशीर ठरणार का, याबद्दल उत्सुकता होती. परंतु, स्थानिक मुद्द्यांच्या आधारेच मतदारांनी मतदान केल्याचं निकालातून स्पष्ट होतं. त्यामुळे येत्या काळात भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस