शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

Farm laws Repeal: “शेतकरी आंदोलनामुळे एक पाऊल मागे, पुन्हा कृषी कायदे बनवले जातील”: कलराज मिश्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 10:55 IST

Farm laws Repeal: भविष्यात आवश्यकता भासल्यास पुन्हा कृषी कायदे बनवले जातील, असे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी म्हटले आहे.

जयपूर: वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे रद्द (Farm laws Repeal) करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी सकाळी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात केली. नवे कृषी कायदे का केले, याबाबतचे सत्य शेतकरी बांधवांना समजावून सांगण्यात आमचे प्रयत्न, तपश्चर्या कमी पडली. त्यामुळे देशाची मनापासून माफी मागतो, असे म्हणत, आगामी अधिवेशनात हे कायदे मागे घेण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू, असे त्यांनी जाहीर केले. यानंतर देशभरातून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. यातच आता राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी कृषी कायदे रद्द केल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देतान, भविष्यात आवश्यकता भासल्यास पुन्हा कृषी कायदे बनवले जातील, असे म्हटले आहे. 

राजस्थानचे राज्यपाल असलेल्या कलराज मिश्र यांनी भदोई येथे मीडियाशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचा घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे. केंद्रीय कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते. मात्र, शेतकऱ्यांना समजवण्यास किंवा ते पटवून देण्याचा सरकारने सातत्याने प्रयत्न केला. तरीही शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आणि कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम होते. अखेर कृषी कायदे रद्द केले पाहिजे, असे सरकारला वाटले, असे कलराज मिश्र यांनी सांगितले.

पुन्हा कृषी कायदे बनवले जातील

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या केलेली घोषणा म्हणजे सकारात्मक दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पण सध्याची परिस्थिती अनुकूल नाही. पंतप्रधान मोदींचा हा निर्णय साहस आणि धाडस दर्शवतो. मात्र, भविष्यात गरज भासल्यास पुन्हा एकदा कृषी कायदे करण्यात येतील, असे कलराज मिश्र यांनी म्हटले आहे. 

शेतकरी आंदोलन मागे घेणार नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली असली, तरी शेतकरी नेते आणि आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. केंद्र सरकारच्या निर्णयाचे शेतकरी संघटनांनी स्वागत केले असले, तरी संसदेत कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरुच राहील, अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घेतली आहे.   

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थान