शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "लोक मरत होते, तेव्हा मोदी थाळी वाजवायला सांगत होते"; राहुल गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 17:42 IST

Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा देशभरात लोकांचा मृत्यू होत होता तेव्हा मोदी थाळी वाजवायला सांगत होते. यासोबतच पंतप्रधान भांडवलदारांसाठी काम करत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. 

राजस्थानमधील चुरू येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी "इथे आम्ही गरीबांचे सरकार चालवतो, आम्ही तुमचे संरक्षण करतो. त्याचवेळी नरेंद्र मोदींनी जीएसटी लागू केला आणि पहिल्यांदाच देशातील शेतकऱ्यांना कर भरावा लागला. त्यांनी (मोदी) नोटाबंदी केली आणि सर्व छोट्या व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त केलं" असं म्हटलं आहे. 

"काँग्रेसचं सरकार म्हणजे शेतकऱ्यांचं, मजुरांचं सरकार"

"आज लोक पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आश्वासनांवर हसतात. 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिलं होतं. लोकांना ते मिळाले का? मोदींचा हमीभाव म्हणजे अदानीचा हमीभाव आणि काँग्रेसचे सरकार म्हणजे शेतकरी आणि मजुरांचे सरकार आहे."

"तुम्हाला अदानींचं सरकार हवं आहे की शेतकरी, मजूर आणि तरुणांचं? राजस्थान सरकारने लोकांसाठी खूप काम केलं असून भाजपा सरकार सत्तेवर आल्यास ते हे सर्व काही उद्ध्वस्त करतील आणि अब्जाधीशांसाठी काम करतील" असा दावा राहुल गांधी यांनी केला.

"मोदी श्रीमंतांसाठी काम करतात"

"जिकडे पाहावे तिकडे अदानी काही ना काही उद्योग करत आहेत. विमानतळ, बंदरं, सिमेंट प्लांट, रस्ते सर्व त्यांच्या मालकीचं आहे. मोदी श्रीमंतांसाठी काम करतात. ते अदानीला मदत करतात, अदानी पैसे कमवतात आणि तो पैसा परदेशात वापरला जातो."

"नरेंद्र मोदींनी कृषी कायदा आणला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असं सांगितले, पण देशातील सर्व शेतकरी त्याविरोधात संपावर बसले. शेतकरी म्हणाले, हा आमचा कायदा नाही, अदानी-अंबानींचा कायदा आहे. शेवटी काँग्रेसने शेतकऱ्यांसह हा कायदा रद्द केला" असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केला आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक