शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

Rahul Gandhi : "लोक मरत होते, तेव्हा मोदी थाळी वाजवायला सांगत होते"; राहुल गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 17:42 IST

Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा देशभरात लोकांचा मृत्यू होत होता तेव्हा मोदी थाळी वाजवायला सांगत होते. यासोबतच पंतप्रधान भांडवलदारांसाठी काम करत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. 

राजस्थानमधील चुरू येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी "इथे आम्ही गरीबांचे सरकार चालवतो, आम्ही तुमचे संरक्षण करतो. त्याचवेळी नरेंद्र मोदींनी जीएसटी लागू केला आणि पहिल्यांदाच देशातील शेतकऱ्यांना कर भरावा लागला. त्यांनी (मोदी) नोटाबंदी केली आणि सर्व छोट्या व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त केलं" असं म्हटलं आहे. 

"काँग्रेसचं सरकार म्हणजे शेतकऱ्यांचं, मजुरांचं सरकार"

"आज लोक पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आश्वासनांवर हसतात. 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिलं होतं. लोकांना ते मिळाले का? मोदींचा हमीभाव म्हणजे अदानीचा हमीभाव आणि काँग्रेसचे सरकार म्हणजे शेतकरी आणि मजुरांचे सरकार आहे."

"तुम्हाला अदानींचं सरकार हवं आहे की शेतकरी, मजूर आणि तरुणांचं? राजस्थान सरकारने लोकांसाठी खूप काम केलं असून भाजपा सरकार सत्तेवर आल्यास ते हे सर्व काही उद्ध्वस्त करतील आणि अब्जाधीशांसाठी काम करतील" असा दावा राहुल गांधी यांनी केला.

"मोदी श्रीमंतांसाठी काम करतात"

"जिकडे पाहावे तिकडे अदानी काही ना काही उद्योग करत आहेत. विमानतळ, बंदरं, सिमेंट प्लांट, रस्ते सर्व त्यांच्या मालकीचं आहे. मोदी श्रीमंतांसाठी काम करतात. ते अदानीला मदत करतात, अदानी पैसे कमवतात आणि तो पैसा परदेशात वापरला जातो."

"नरेंद्र मोदींनी कृषी कायदा आणला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असं सांगितले, पण देशातील सर्व शेतकरी त्याविरोधात संपावर बसले. शेतकरी म्हणाले, हा आमचा कायदा नाही, अदानी-अंबानींचा कायदा आहे. शेवटी काँग्रेसने शेतकऱ्यांसह हा कायदा रद्द केला" असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केला आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक