शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

वादग्रस्त अध्यादेशावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे पुनर्विचार करण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 10:23 AM

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी वादग्रस्त अध्यादेशाबाबत पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहेत. घोटाळेबाजांना अभय देणाऱ्या राजस्थान सरकारच्या अध्यादेशावरुन वाद निर्माण झाला आहे.

जयपूर - राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी वादग्रस्त अध्यादेशाबाबत पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहेत. घोटाळेबाजांना अभय देणाऱ्या राजस्थान सरकारच्या अध्यादेशावरुन वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी (23 ऑक्टोबर) राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीत अध्यादेशाबाबत चर्चा झाल्याचे माहिती समोर आली. राजस्थान सरकारने मागील महिन्यात गुन्हेगारी कायदे (राजस्थान सुधारणा) वटहुकूम 2017 जारी केला होता. यानुसार विद्यमान व माजी न्यायाधीशांना तसेच दंडाधिकारी व सरकारी कर्मचारी यांनी सेवेत असताना घेतलेल्या निर्णयांबाबत सरकारच्या परवानगीशिवाय चौकशी करता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली होती. याशिवाय सरकारी नोकर, न्यायाधीश आणि दंडाधिकारी यांच्याविरोधात सरकारने चौकशी करण्याची परवानगी दिल्याशिवाय माध्यमांना वार्तांकन करता येणार नाही, असे वटहुकूमात म्हटले होते.

राजस्थान हायकोर्टात दोन याचिका दाखल झाल्यानंतर आणि विधानसभामध्ये झालेल्या गोंधळानंतर सोमवारी संध्याकाळी वसुंधरा राजे यांनी चार वरिष्ठ मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी यांना वादग्रस्त अध्यादेशवर चर्चा करण्यास बोलवले होते. या अध्यादेशामुळे  सरकारला सर्व स्तरातून टीकेचा सामना करावा लागत आहे. भाजपाचे दोन आमदारदेखील याला 'काळा कायदा' मानत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील मंत्री गुलाबचंद कटारिया, युनूस खान, अरुण चतुर्वेदी, राजेंद्र राठोड आणि प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी हे सोमवारी झालेल्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अध्यादेशानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, या अध्यादेशात सुधारणा होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांकडून समजते.