शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्याच्या पाच मुली अन् पाचही झाल्या RAS अधिकारी, इयत्ता ५ वी नंतर घरीच केला अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 13:18 IST

राजस्थानच्या हनुमानगड येथील भैरुसरी नावाच्या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या पाच मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

राजस्थानच्या हनुमानगड येथील भैरुसरी नावाच्या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या पाच मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. सहदेव सहारण नावाच्या शेतकऱ्याच्या तीन मुलींची नुकतीच राजस्थान प्रशासन सेवेत (RAS) निवड झाली आहे. विशेष म्हणजे या तिनही मुली इयत्ता पाचवीनंतर कधीच शाळेत गेल्या नाहीत. त्यांनी राहत्या घरातूनची शिक्षण पूर्ण केलं आहे. कारण वडिलांच्या शेतीतून अत्यल्प उत्पन्न मिळत होतं. त्यामुळे शाळे पाठविण्यासाठी देखील पैसे सहदेव यांच्याकडे नसायचे. पण त्यांच्या मुलींनी एकमेकींना साथ देत स्वत:च्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं आहे. 

सहदेव सहारण यांना एकूण पाच मुली आहेत आणि सध्याच्या घडीला पाचही मुली सरकारी सेवेत कार्यरत आहेत. यातील एक मुलगी झुंझुनूमध्ये बीडीओ पदावर सरकारी सेवेत कार्यरत आहे. तर आता तीन मुलींची आरएएसमध्ये निवड झाली आहे. मुलीला डोक्यावरचं ओझं मानणाऱ्यांसाठी सहदेव यांच्या पाचही मुली आज प्रेरणास्थान ठरत आहेत. मुलींना केव्हाच शिक्षण घेण्यापासून रोखलं नाही, असं सहदेव सांगतात. आरएएसचा निकाल जाहीर झाला आणि तिन्ही बहिणींची निवड झाल्याचं समजल्यानंतर सहारण यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. संपूर्ण गावात सहदेव यांच्या मुलींचं कौतुक केलं जात आहे. 

राजस्थान प्रशासकीय सेवा २०१८ (RAS) चे निकाल जाहीर झाले आहेत. यात सहदेव यांच्या अंशु, रितू आणि सुमन या तिनही मुलींची निवड झाली आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांची मुलाखत प्रक्रिया मंगळवारी पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा अंतिम निकाल जाहीर करण्यात आले. यात सहदेव यांच्या तिनही मुलींनी यश प्राप्त केलं आहे. 

सहदेव यांच्या मुलींचं आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनीही कौतुक केलं आहे. "शेतकरी सहदेव सहारण यांच्या पाचही मुली आता आरएएस अधिकारी आहे. काल रितू, अंशु आणि सुमन यांची निवड झाली. तर दोन मुली याआधीपासूनच सरकारी सेवेत आहेत. सहारण कुटुंब आणि संपूर्ण गावासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे", असं ट्विट प्रवीण कासवान यांनी केलं आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRajasthanराजस्थान