शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
2
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
3
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
4
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
5
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
6
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: “हे आम्ही खपवून घेणार नाही”; मतदान केल्यावर राज ठाकरेंचा इशारा
7
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
8
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
9
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
10
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
11
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
12
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
13
२१ जानेवारीपासून अमेरिकेची दारे बंद! ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया रोखली; भारतावर काय होणार परिणाम?
14
मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले...
15
PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले
16
निवृत्तीची चिंता संपली! पोस्टाची 'ही' स्कीम करेल मालामाल; दरमहा होईल ₹२०,००० ची कमाई, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल
18
कर्मचाऱ्यांना मिळणार ₹२ कोटींपर्यंतच्या इन्शुरन्स, स्वस्त लोनसह हे फायदे; लाँच झाली नवी सुविधा, जाणून घ्या
19
काही हरवलंय? काळजी सोडा! 'हा' एक मंत्र तुमची वस्तू शोधून देईल; अनेकांनी घेतलाय अनुभव 
20
731666404000 रुपये 'साफ'...! मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलरच्या क्लब मधून बाहेर; आता Q3 वर नजर
Daily Top 2Weekly Top 5

सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:06 IST

Rajasthan Accident News: सासू, पाच सुना आणि मुलगी अशा  एकाच कुटुंबातील सात महिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. फतेहपूर शेखावटी येथे झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळावरील विदारक दृश्य पाहून पाहणाऱ्यांचे मन हेलावले आणि डोळ्यांत पाणी आले.

सासू, पाच सुना आणि मुलगी अशा  एकाच कुटुंबातील सात महिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. फतेहपूर शेखावटी येथे झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळावरील विदारक दृश्य पाहून पाहणाऱ्यांचे मन हेलावले आणि डोळ्यांत पाणी आले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार या कुटुंबाच्या नात्यातील एका महिलेचं निधन झालं होतं. तिच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होऊन हे कुटुंबीय काही वाहनांमधून माघारी परतत होते. त्यात या सर्व महिला एका कारमध्ये बसल्या होत्या. ही कार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर हरसावा गावाजवळ आली असताना कारच्या चालकाने भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही कार आधी एका पीकअपवर आदळली आणि तशीच फरफटत जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकमध्ये घुसली.

या अपघातात कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला. तसेच कारमधून प्रवास करणारी वृद्ध सासू, पाच सुना आणि मुलगी अशा मिळून ७ जणांचा मृत्यू झाला. तर एक तरुणी आणि ड्रायव्हर गंभीर जखमी झाले.  मृतांमध्ये सासू मोहिनी देवी आणि चंदा देवी, तुलसी देवी, बरखा देवी, आशा देवी, संतोष देवी या सुना आणि इंदिरा या मुलगीचा समावेश होता. तर सोनू आणि कारचालक वसीम हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हरसावा गावाजवळ ही कार पोहोचली असतानाच कारचालकाने ओव्हरटेक कऱण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान, भरधाव वेगामुळे कारवरचं त्याचं नियंत्रण सुटलं आणि ही कार पिकअपवर आदळली. त्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रकमध्ये जाऊन घुसली. अपघाताचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या लोकांनी आणि तिथून जात असलेल्या वाहन चालकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच गंभीर जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघात एवढा भीषण होता की त्यात यापैकी काही महिलांचा आधीच मृत्यू झाला होता.

दरम्यान, अंत्यसंस्काराहून परतताना कुटुंबीयांनी कारचालकाला वाहन हळू चालवण्याबाबत बजावले होते. मात्र त्याने भरधाव वेगात कार चालवली आणि ही भीषण दुर्घटना घडली, अशी माहितीही समोर येत आहे.  

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानFamilyपरिवार