शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

संसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वात यशस्वी; दोन्ही सभागृहांनी संमत केली 20 विधेयके

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 2:55 PM

या अधिवेशनामध्ये 17 दिवसांच्या कामकाजात दोन्ही सभागृहांनी 20 विधेयके संमत केली.

नवी दिल्ली- संसदेचे पावसाळी अधिवेशन एक यशस्वी अधिवेशन म्हणून ओळखले जात आहे. गेल्या काही वर्षांचा विचार करता या अधिवेशनात चांगल्या प्रकारे आणि जास्त काम झाल्याचे दिसून आले. या अधिवेशनामध्ये 17 दिवसांच्या कामकाजात दोन्ही सभागृहांनी 20 विधेयके संमत केली. वर्ष 2000 नंतर प्रथमच एवढे कामकाज झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कार्यकाळामध्ये लोकसभेची उत्पादनशक्ती 118 टक्के तर राज्यसभेची उत्पादनशक्ती 74 टक्के इतकी होती. हे अधिवेशन सत्ताधारी रालोअासाठी सर्वात लाभदायी ठरले असे म्हणता येईल. तेलगू देसमने आणलेला अविश्वासदर्शक ठराव मोठ्या फरकाने हाणून पाडण्यात आणि राज्यसभेत उपाध्यक्षपदी आपल्याच आघाडीकडे राखण्यात त्यांना यश आले.

हे अदिवेशन म्हणजे सामाजिक न्यायाच्यादृष्टीने एखाद्या सणासारखे असल्याचे मत संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितले. या अधिवेशनामध्येच एससी, एसटी प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रोसिटिज दुरुस्ती कायदा संमत झाला तसेच ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज 18 जुलैरोजी सुरु झाले आणि शुक्रवारी 10 ऑगस्ट रोजी संपले.24 दिवसांच्या काळामध्ये 17 दिवसाचे कामकाज झाले आणि त्यात लोकसभेची उत्पादनशक्ती 118 टक्के व राज्यसभेची 74 टक्के इतकी होती असे संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी सांगितले. याच अधिवेशनामध्ये केंद्र सराकरिवरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. सरकारने हा ठराव मोठ्या फरकाने पराभूत करुन आपले सरकार भक्कम असल्याची प्रचिती विरोधकांनी दिली. लोकसभा आणि राज्यसभेत या अधिवेशनामध्ये 21 विधेयके मांडण्यात आली. लोकसभेने 21 तर राज्यसभेने 14 विधेयके मंजूर केली तर दोन्ही सभागृहांनी 20 विधेयके मंजूर केली.पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चच्या माहितीनुसार वर्ष 2000 नंतर इतकी जास्त उत्पादनशक्ती प्रथमच दिसून आली आहे. दोन्ही सभागृहांनी कामकाजासाठी दिलेला वेळही भरपूर होता. 2004 नंतर सभागृहांनी सर्वात जास्त वेळ देण्याची ही घचना होती असेही पीआरएसने म्हटले आहे.या अधिवेशनातील 27 तासांचा कार्यकाळ आंध्र प्रदेशला विशेष दर्जाची मागणी, स्विझर्लंडमधील भारतीयांचा पैसा, जमावाद्वारे होणाऱ्या हत्या, आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन, राफेल खरेदी, देवरिया येथील आश्रयगृहातील मुलींचा छळ अशा मुद्द्यांमुळे सभागृहात केलेल्या निदर्शनांमुळे वाया गेला.

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा