शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेत पावसाचा कहर, नेपाळच्या पावसामुळे गंगेला आले रौद्र रूप; एका दिवसांत २८ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 11:47 IST

हरयाणात धरण फुटले; पंजाबमध्ये अख्खे कुटुंब वाहून गेले; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: रविवारी उत्तर आणि वायव्य भारतात मुसळधार पावसाने किमान २८ लोकांचा मृत्यू झाला. यात दरडी कोसळणे, वाहतूक कोंडी आणि घरे कोसळण्याच्या घटना घडल्या. हरयाणात धरण फुटल्याने अनेक गावे जलमय झाली. दिल्ली, पंजाब, बिहार, राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली असून, वाहने पाण्यात अडकली आहेत. दिल्लीतील रोहिणी पार्कमध्ये पाण्यात बुडून ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. नेपाळच्या तराई भागातील पावसामुळे बिहारच्या पूरस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. पाण्याचा स्तर वाढल्याने अनेक ठिकाणी लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.

बिहारच्या पाटणा, भागलपूरसह अन्य जिल्ह्यांत गंगा, कोसी व अन्य नद्यांची पाणी पातळी सतत वाढत असून, नद्यांचे रौद्र रूप पाहून लोकांची धाकधूक वाढत आहे. मुसळधार पाऊस आणि मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर धरणातून पाणी सोडल्यामुळे गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

लग्नाला निघाले होते, नदीत कार घातली अन् घात झाला

होशियारपूर : पंजाबच्या होशियारपूरपासून सुमारे ३४ किमी अंतरावर असलेल्या जैजों येथे पूर आलेली नदी पार करताना वाहन वाहून गेल्याने एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला असून, १ जण बेपत्ता झाला. पंजाब आणि इतर भागात मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. हे कुटुंब हिमाचल प्रदेशातील मेहरोवाल येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात असतानाच ही घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करून या वाहनातील एकाची सुटका केल्याने तो वाचला आहे. नदीतून दोन महिलांसह सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बेपत्ता झालेल्या तिघांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरRainपाऊसriverनदी