शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

पाच वर्षांत निवडणुकांमध्ये पैशांचा पाऊस, भाजपाने खर्च केले ३ हजार ५८५ तर काँग्रेसकडून १४०५ कोटी रुपये खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 09:57 IST

Election In India: गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील निवडणुका ह्या कमालीच्या खर्चिक झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर मर्यादा आणली आहे. मात्र तरीही राजकीय पक्ष प्रचारामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करतात.

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील निवडणुका ह्या कमालीच्या खर्चिक झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर मर्यादा आणली आहे. मात्र तरीही राजकीय पक्ष प्रचारामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करतात. दरम्यान, गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने ३ हजार ५८५ कोटी रुपये खर्च केले. तर काँग्रेसने १४०५ कोटी रुपये खर्च केले.सेंटर फॉर मीडिया स्टडीजने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल ६० हजार कोटी रुपये खर्च झाले होते. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ३० हजार कोटी रुपये खर्च झाले होते.

एकट्या भाजपाने गेल्या पाच वर्षांत ३ हजार ५८५ रुपये निवडणुकांवर खर्च केले होते. १ हजार ४०५  कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. हा आकडा २०१५-१६ पासून २०१९-२० पर्यंतचा आहे. ही माहिती राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे.दरम्यान, यावेळी एकट्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये चार हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. हा पैसा हा मागच्या दरवाजाने येत असतो. त्यामुळेच निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपयांचा कॅश पकडला जात आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात २० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने  उत्तर प्रदेशमधून १९१ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. तर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी उत्तर प्रदेशात ११५ कोटी रुपयांची रोकड सापडली होती.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसMONEYपैसा