शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भगवा रंग, ताशी 130 किमी वेग... सर्वसामान्यांसाठी खास आहे अमृत भारत ट्रेन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 21:01 IST

Amrit Bharat Train : अयोध्या ते बिहारमधील सीतामढी दरम्यान धावणारी अमृत भारत ट्रेन ही भारतातील पहिली अमृत भारत ट्रेन असणार आहे. 

नवी दिल्ली : श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 30 डिसेंबरला अयोध्येत होणार आहे. याच दिवशी नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृत भारत ट्रेनला (Amrit Bharat Train)  हिरवा झेंडा दाखवणार आहेत. अयोध्या ते बिहारमधील सीतामढी दरम्यान धावणारी अमृत भारत ट्रेन ही भारतातील पहिली अमृत भारत ट्रेन असणार आहे. 

सर्व सामान्यांसाठी असलेल्या या विशेष ट्रेनची चाचणी गेल्या महिन्यात घेण्यात आली. ही पुल-पुश ट्रेन आहे, जी खूप लवकर वेग पकडते. अमृत ​​भारत ट्रेन ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणार आहे. अमृत ​​भारत एक्सप्रेसचा रंग भगवा आहे. या ट्रेनचे इंजिन वंदे भारत आणि ईएमयूच्या पार्श्वभूमीवर असणार आहे. विशेष म्हणजे ट्रेन पूर्णपणे भगव्या रंगाची असणार आहे. कोचच्या खिडकीच्या वर आणि खाली भगव्या रंगाचा पट्टा आहे. 

देशातील कामगार, कष्टकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून अमृत भारत ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. यात स्लीपर आणि जनरल क्लासचे डबे असतील. अमृत ​​भारत ट्रेनमध्ये 22 डबे असतील. यात 12 द्वितीय श्रेणी 3 टियर स्लीपर कार, 8 सामान्य द्वितीय श्रेणी कोच आणि दोन गार्ड कोच असू शकतात. ट्रेनमध्ये अंदाजे 1,800 प्रवाशांना प्रवास करण्यासाठी जागा असणार आहे.

अमृत ​​भारत ट्रेन ही पुल-पुश ट्रेन आहे. म्हणजे एक इंजिन ट्रेनच्या पुढच्या बाजूला आणि एक मागच्या बाजूला असणार आहे. पुल-पुश टेक्नॉलॉजीमुळे अमृत भारत ट्रेन जलद गतीने पिकअप घेऊ शकेल आणि वेग वाढेल. समोरचं इंजिन ट्रेनला ओढतं आणि मागचं इंजिन ट्रेनला ढकलतं. समोरच्या इंजिनमधून लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट ट्रेन चालवतात. टेक्नॉलॉजीच्या भाषेत याला पुश-पुल लोकोमोटिव्ह म्हणतात.

अमृत ​​भारत ट्रेनचे भाडे फार जास्त असणार नाही. कारण सर्वसामान्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे भाडे सामान्य ठेवण्यात येणार आहे. ट्रेनच्या आसनांसह मोबाईल चार्जर आणि बॉटल होल्डर देखील असणार आहे. ही ट्रेन लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणार आहे. विशेषतः अशा मार्गांवर जिथे कामगार आणि मजूर खूप प्रवास करतात.

देशातील पहिली अमृत भारत ट्रेन रामनगरी अयोध्या ते माता सीतेची जन्मभूमी मिथिला यादरम्यान जोडली जाणार आहे. अयोध्येहून पहिली अमृत भारत ट्रेन दरभंगामार्गे सीतामढीला पोहोचेल. अयोध्येपासून सीतामढी ५७२ किलोमीटर अंतरावर आहे. अयोध्येला देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडण्याचा सरकारचा मानस आहे. भविष्यात अयोध्येपासून देशाच्या इतर भागांमध्येही नवीन गाड्या चालवल्या जाऊ शकतात.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारbusinessव्यवसाय