शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

भगवा रंग, ताशी 130 किमी वेग... सर्वसामान्यांसाठी खास आहे अमृत भारत ट्रेन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 21:01 IST

Amrit Bharat Train : अयोध्या ते बिहारमधील सीतामढी दरम्यान धावणारी अमृत भारत ट्रेन ही भारतातील पहिली अमृत भारत ट्रेन असणार आहे. 

नवी दिल्ली : श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 30 डिसेंबरला अयोध्येत होणार आहे. याच दिवशी नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृत भारत ट्रेनला (Amrit Bharat Train)  हिरवा झेंडा दाखवणार आहेत. अयोध्या ते बिहारमधील सीतामढी दरम्यान धावणारी अमृत भारत ट्रेन ही भारतातील पहिली अमृत भारत ट्रेन असणार आहे. 

सर्व सामान्यांसाठी असलेल्या या विशेष ट्रेनची चाचणी गेल्या महिन्यात घेण्यात आली. ही पुल-पुश ट्रेन आहे, जी खूप लवकर वेग पकडते. अमृत ​​भारत ट्रेन ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणार आहे. अमृत ​​भारत एक्सप्रेसचा रंग भगवा आहे. या ट्रेनचे इंजिन वंदे भारत आणि ईएमयूच्या पार्श्वभूमीवर असणार आहे. विशेष म्हणजे ट्रेन पूर्णपणे भगव्या रंगाची असणार आहे. कोचच्या खिडकीच्या वर आणि खाली भगव्या रंगाचा पट्टा आहे. 

देशातील कामगार, कष्टकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून अमृत भारत ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. यात स्लीपर आणि जनरल क्लासचे डबे असतील. अमृत ​​भारत ट्रेनमध्ये 22 डबे असतील. यात 12 द्वितीय श्रेणी 3 टियर स्लीपर कार, 8 सामान्य द्वितीय श्रेणी कोच आणि दोन गार्ड कोच असू शकतात. ट्रेनमध्ये अंदाजे 1,800 प्रवाशांना प्रवास करण्यासाठी जागा असणार आहे.

अमृत ​​भारत ट्रेन ही पुल-पुश ट्रेन आहे. म्हणजे एक इंजिन ट्रेनच्या पुढच्या बाजूला आणि एक मागच्या बाजूला असणार आहे. पुल-पुश टेक्नॉलॉजीमुळे अमृत भारत ट्रेन जलद गतीने पिकअप घेऊ शकेल आणि वेग वाढेल. समोरचं इंजिन ट्रेनला ओढतं आणि मागचं इंजिन ट्रेनला ढकलतं. समोरच्या इंजिनमधून लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट ट्रेन चालवतात. टेक्नॉलॉजीच्या भाषेत याला पुश-पुल लोकोमोटिव्ह म्हणतात.

अमृत ​​भारत ट्रेनचे भाडे फार जास्त असणार नाही. कारण सर्वसामान्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे भाडे सामान्य ठेवण्यात येणार आहे. ट्रेनच्या आसनांसह मोबाईल चार्जर आणि बॉटल होल्डर देखील असणार आहे. ही ट्रेन लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणार आहे. विशेषतः अशा मार्गांवर जिथे कामगार आणि मजूर खूप प्रवास करतात.

देशातील पहिली अमृत भारत ट्रेन रामनगरी अयोध्या ते माता सीतेची जन्मभूमी मिथिला यादरम्यान जोडली जाणार आहे. अयोध्येहून पहिली अमृत भारत ट्रेन दरभंगामार्गे सीतामढीला पोहोचेल. अयोध्येपासून सीतामढी ५७२ किलोमीटर अंतरावर आहे. अयोध्येला देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडण्याचा सरकारचा मानस आहे. भविष्यात अयोध्येपासून देशाच्या इतर भागांमध्येही नवीन गाड्या चालवल्या जाऊ शकतात.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारbusinessव्यवसाय