शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

'मला सर नाही, बॉस म्हणा', नव्या रेल्वेमंत्र्यांनी सिग्नल विभागाच्या इंजिनिअरला असं का सांगितलं? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 22:20 IST

रेल्वेमंत्र्यांची एका इंजिनिअरसोबत भेट झाली आणि याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नुकतेच मोठे बदल करण्यात आले. यात अश्विनी वैष्णव यांना देशाचे नवे रेल्वेमंत्री नियुक्त करण्यात आलं. मंत्रालयात पदभार स्वीकारताच रेल्वे मंत्रालयात काही महत्वपूर्ण बदल त्यांनी केले. रेल्वे मंत्रालयाच्या ऑफीसची कामकाजाची वेळ त्यांनी बदलली. याच दरम्यान रेल्वेमंत्र्यांची एका इंजिनिअरसोबत भेट झाली आणि याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

IAS अधिकारी, अटलजींचे 'सेक्रेटरी' आणि आता केंद्रात मंत्री... अश्विनी वैष्णव यांना मोठी संधी

नवनिर्वाचित रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी रेल्वेत सिग्नल विभागाच्या एका इंजिनिअरची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात इंजिनिअरनं आपण त्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत जिथं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचंही शिक्षण झालं आहे याची कल्पना रेल्वेमंत्र्यांना दिली. मग क्षणार्धात अश्विनी वैष्णव यांनी इंजिनिअरची गळाभेट घेतली. 

"आपल्या महाविद्यालयात ज्युनिअर, सीनिअरला सर नव्हे, तर बॉस बोलण्याची पद्धत होती. तर मग आता तुम्हीही मला बॉस बोलणार का?", असं अश्विनी वैष्णव यांनी मिश्किलपणे म्हटलं. त्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर जुन्या आठवणींनी हास्य फुललं. 

भारतात कायद्याला सर्वोच्च स्थान, नियम पाळावेच लागतील; अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला रोखठोक इशारा

आयएएस राहिलेल्या अश्विनी वैष्णव यांचं राजस्थानच्या जोधपूर येथील एमबीएम इंजिनिअरिंग महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं आहे. रेल्वे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना अश्विनी वैष्णव यांनी यावेळी आपलं घर समजून काम करा, जेणेकरुन काम करताना आनंद निर्माण होईल व चांगलं काम होईल असं आवाहन केलं. 

दरम्यान, रेल्वे मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच अश्विनी वैष्णव यांनी कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल केले. नव्या आदेशानुसार रेल्वे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे. यात पहिली शिफ्ट सकाळी ७ वाजता सुरू होऊन दुपारी ४ वाजता संपणार आहे. तर दुसरी शिफ्ट दुपारी ३ वाजता सुरू होऊन रात्री १२ वाजता संपणार आहे. 

माजी IAS अधिकारी रेल्वे मंत्री बनतो तेव्हा; पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना लावलं कामाला

देशातील महत्वाच्या मंत्रालयांपैकी एक असलेल्या रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचीही धुरा सोपविण्यात आली आहे. याआधी रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी पियूष गोयल यांच्याकडे होती. आता त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे. त्याआधी हे खातं स्मृती इराणी यांच्याकडे होतं. 

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे