शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

रेल्वेची पोलखोल; गेल्या दहा वर्षात 1.71 लाख चोरीच्या घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 11:45 IST

गेल्या दहा वर्षात रेल्वेमध्ये 1.71 लाख चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत.

नवी दिल्ली : गर्दीचा फायदा तसेच प्रवासी बेसावध असताना किंवा अंधाराचा फायदा घेऊन रेल्वेमध्ये चोरी करण्याच्या घटना सतत वाढत आहेत. गेल्या दहा वर्षात रेल्वेमध्ये 1.71 लाख चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. दरम्यान, माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही रेल्वेतील सुरक्षेतेची माहिती समोर आली आहे.  

यानुसार, रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, "दररोज सरासरी 2,500 मेल, एक्सप्रेस गाड्यांची रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे सुरक्षा विशेष दल यांच्या सुरक्षा हाताळली जाते. याशिवाय जवळपास 2200 रेल्वे गाड्यांची सरकारी रेल्वे पोलीस स्टाफकडून सुरक्षा पाहिली जाते."   

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक चोरीच्या घटना 2018 मध्ये झाल्याची नोंद आहे. 2018 मध्ये 36,584 चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर, 2017 मध्ये 33044, 2016 मध्ये 22106, 2015 मध्ये 19215, 2014 मध्ये 14301, 2013 मध्ये 12261, 2012 मध्ये 9292, 2011 मध्ये 9653, 2010 मध्ये 7549 आणि 2009 मध्ये 7010 चोरीच्या घटना घडल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने सांगितले होते की, मागील चार वर्षात रेल्वे प्रवाशांकडून पैसे उकळल्याप्रकरणी 73837 तृतीयपंथीयांना अटक केली होती. 2015 ते जानेवारी 2019 या काळात रेल्वे पोलिसांनी 73837 तृतीयपंथीयांना रेल्वे प्रवाशांना लुटल्याच्या अथवा त्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून अटक केली होती.

2015 मध्ये 13546, 2016 मध्ये 19800, 2017 मध्ये 18526 तर 2018 मध्ये 20566 तृतीयपंथी गुन्हेगारांना रेल्वे प्रवाशांची लूट केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले होते. 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसIndian Railwayभारतीय रेल्वे