शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

रेल्वेची पोलखोल; गेल्या दहा वर्षात 1.71 लाख चोरीच्या घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 11:45 IST

गेल्या दहा वर्षात रेल्वेमध्ये 1.71 लाख चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत.

नवी दिल्ली : गर्दीचा फायदा तसेच प्रवासी बेसावध असताना किंवा अंधाराचा फायदा घेऊन रेल्वेमध्ये चोरी करण्याच्या घटना सतत वाढत आहेत. गेल्या दहा वर्षात रेल्वेमध्ये 1.71 लाख चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. दरम्यान, माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही रेल्वेतील सुरक्षेतेची माहिती समोर आली आहे.  

यानुसार, रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, "दररोज सरासरी 2,500 मेल, एक्सप्रेस गाड्यांची रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे सुरक्षा विशेष दल यांच्या सुरक्षा हाताळली जाते. याशिवाय जवळपास 2200 रेल्वे गाड्यांची सरकारी रेल्वे पोलीस स्टाफकडून सुरक्षा पाहिली जाते."   

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक चोरीच्या घटना 2018 मध्ये झाल्याची नोंद आहे. 2018 मध्ये 36,584 चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर, 2017 मध्ये 33044, 2016 मध्ये 22106, 2015 मध्ये 19215, 2014 मध्ये 14301, 2013 मध्ये 12261, 2012 मध्ये 9292, 2011 मध्ये 9653, 2010 मध्ये 7549 आणि 2009 मध्ये 7010 चोरीच्या घटना घडल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने सांगितले होते की, मागील चार वर्षात रेल्वे प्रवाशांकडून पैसे उकळल्याप्रकरणी 73837 तृतीयपंथीयांना अटक केली होती. 2015 ते जानेवारी 2019 या काळात रेल्वे पोलिसांनी 73837 तृतीयपंथीयांना रेल्वे प्रवाशांना लुटल्याच्या अथवा त्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून अटक केली होती.

2015 मध्ये 13546, 2016 मध्ये 19800, 2017 मध्ये 18526 तर 2018 मध्ये 20566 तृतीयपंथी गुन्हेगारांना रेल्वे प्रवाशांची लूट केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले होते. 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसIndian Railwayभारतीय रेल्वे