शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

रेल्वेची पोलखोल; गेल्या दहा वर्षात 1.71 लाख चोरीच्या घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 11:45 IST

गेल्या दहा वर्षात रेल्वेमध्ये 1.71 लाख चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत.

नवी दिल्ली : गर्दीचा फायदा तसेच प्रवासी बेसावध असताना किंवा अंधाराचा फायदा घेऊन रेल्वेमध्ये चोरी करण्याच्या घटना सतत वाढत आहेत. गेल्या दहा वर्षात रेल्वेमध्ये 1.71 लाख चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. दरम्यान, माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही रेल्वेतील सुरक्षेतेची माहिती समोर आली आहे.  

यानुसार, रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, "दररोज सरासरी 2,500 मेल, एक्सप्रेस गाड्यांची रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे सुरक्षा विशेष दल यांच्या सुरक्षा हाताळली जाते. याशिवाय जवळपास 2200 रेल्वे गाड्यांची सरकारी रेल्वे पोलीस स्टाफकडून सुरक्षा पाहिली जाते."   

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक चोरीच्या घटना 2018 मध्ये झाल्याची नोंद आहे. 2018 मध्ये 36,584 चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर, 2017 मध्ये 33044, 2016 मध्ये 22106, 2015 मध्ये 19215, 2014 मध्ये 14301, 2013 मध्ये 12261, 2012 मध्ये 9292, 2011 मध्ये 9653, 2010 मध्ये 7549 आणि 2009 मध्ये 7010 चोरीच्या घटना घडल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने सांगितले होते की, मागील चार वर्षात रेल्वे प्रवाशांकडून पैसे उकळल्याप्रकरणी 73837 तृतीयपंथीयांना अटक केली होती. 2015 ते जानेवारी 2019 या काळात रेल्वे पोलिसांनी 73837 तृतीयपंथीयांना रेल्वे प्रवाशांना लुटल्याच्या अथवा त्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून अटक केली होती.

2015 मध्ये 13546, 2016 मध्ये 19800, 2017 मध्ये 18526 तर 2018 मध्ये 20566 तृतीयपंथी गुन्हेगारांना रेल्वे प्रवाशांची लूट केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले होते. 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसIndian Railwayभारतीय रेल्वे