शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Raids on PFI, Imtiaz Jaleel: "तर ही कारवाई चुकीची"; PFIच्या कार्यालयांवरील छाप्यांवर AIMIMचे इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 14:54 IST

PFI वरील छाप्यांमध्ये राज्यातून ४३ तर देशभरातून २४७ जण ताब्यात

Raids on PFI, Imtiaz Jaleel: सध्या संपूर्ण देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात खूप मोठी कारवाई सुरू आहे. तीन-चार दिवसांपूर्वी या ग्रुपच्या कार्यालयांवर छापे टाकत अनेकांना ताब्यात घण्यात आले होत. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास पुन्हा ७ विविध राज्यांमध्ये पोलिसांनी छापे टाकले. माध्यमांतील वृत्तांनुसार, या दरम्यान जवळपास १७० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) १३ राज्यांत छापे टाकत १०६ पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. आज दुपारपर्यंत महाराष्ट्रात ४३ तर देशभरातून २४७ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे. या मुद्द्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याबाबतीत आम्ही जास्त काही बोलणार नाही. याचे कारण ATS किंवा तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. अशा वेळी त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी नक्कीच या प्रकरणी चौकशी केली पाहिजे. ते करत आहेत त्यावर आम्ही बोलणे बरोबर नाही. पण तपास यंत्रणांकडे काहीच पुरावे नसतील तर अशा वेळी उगाच त्यांना त्रास देणं ही कारवाई चुकीची आहे असं मला वाटतं. कारण अगोदरही असं घडलं आहे की काही काही मुलांना अतिरेकी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले, कोर्टाचे खेटे घालावे लागले, १०-१० वर्षे त्यांची तुरूंगात गेली आणि नंतर मात्र त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली अशी उदाहरणे आपल्याकडे आहेत", असे जलिल म्हणाले.

"कोणतीही तपास यंत्रणा असो, त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर कारवाईचा विरोध कोणीच करणार नाही. पीएफआय असो, वा आणखी कोणतीही संघटना असो, त्यावर कारवाई केली जायलाच हवी. पण पुरावे नसतील तर फक्त शक्यतांच्या आधारावर त्यांना डांबून ठेवू नका. कारण त्यांच्या परिवारातही लोकं आहेत. त्यांचे कुटुंबीय आम्हाला भेटायला येतात तेव्हा सांगतात की आमच्या मुलांची चूक नाही. त्यांना मी समजवतो आहे की जर चूक नसेल तर चौकशी झाल्यावर त्यांच्या मुलांना नक्कीच सोडण्यात येईल. पण तपास यंत्रणांना त्यांचे काम करू दिले पाहिजे", असेही जलील यांनी स्पष्ट केले.

"PFI च्या कार्यकर्त्यांवर जी कारवाई केली जात आहे त्याबद्दल विविध मते मांडली जात आहेत. पण मी त्या मतांवर काही बोलणार नाही. कारण तपास यंत्रणांनी काय पुरावे दिले आहेत ते मलाही माहिती नाही. तपास यंत्रणांनी कोर्टात त्यांचे म्हणणे सील केलेल्या पाकिटातून मांडले. त्यामुळे तपास यंत्रणांनी जी चौकशी करायची असेल ती त्यांनी करावी आणि सत्यता समोर आणावी. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या कारवायांचा या देशात कोणीही समर्थन करणार नाही", असेही जलील यांनी ठणकावले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय